शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

केंद्र शासनाच्या यूआरडीपीएफआय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसी हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहेत; परंतु येथे केंद्र ...

अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसी हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहेत; परंतु येथे केंद्र शासनाने २०१४ मध्ये अर्बन ॲण्ड रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन फॉर्म्युलेशन ॲण्ड इम्पलिमेंटेशन गाइडलाइन्स (यूआरडीपीएफआय) आखून दिल्या आहेत; परंतु त्या मार्गदर्शक तत्त्वांची २७ गावे व मनपा हद्दीत नव्याने होणाऱ्या गृहसंकुलांत पालन केले जात नाही. मनपा प्रशासनाचेही त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची टीका केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक, प्रख्यात आर्किटेक्ट राजीव तायशेटे यांनी केली.

तायशेटे म्हणाले की, ‘केंद्र सरकारने २०१४ मध्ये ती मार्गदर्शक तत्त्वे बनवली, तर जानेवारी २०१५ मध्ये ती सामान्य नागरिकांसाठी प्रसिद्ध केली. त्यात अग्निशमन दल, ड्रेनेज व्यवस्था, बस स्टेशन, दळणवळणाची सुविधा, वीज वितरणचे उपकेंद्र, अन्य पब्लिक युटिलिटी, सार्वजनिक वाहनतळ, घनकचरा निर्मूलन आणि महत्त्वाचे म्हणजे कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतंत्र एक हजार चौरस फुटांचे पोलीस ठाणे असणे अत्यावश्यक आहे; परंतु २७ गावांमधील नागरीकरणाचा विचार केल्यास या सर्व बाबींची पूर्तता झालेली नाही. त्यावर मनपा प्रशासनाचा अंकुश नाही. कल्याण-शीळ रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या विविध गृहप्रकल्पांमध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी यासंदर्भात रचना करून परवानग्या घेतल्या आहेत का? नसतील तर केडीएमसी, ठामपा, एमएमआरडीए आदी यंत्रणांनी त्यावर कसा वचक ठेवला आहे, अन्यथा राजरोसपणे बांधकामे उभी राहतील आणि त्या सर्व अनागोंदी कारभारामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या ठिकाणी २०० हेक्टरमध्ये म्हणजेच दीड-दोन लाख नागरिकांच्या वसाहतींमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, असे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.’

---------

२०१६ मधील डीपीआरचे पालन

तायशेटे म्हणाले, की १९९६ मध्ये मनपाने जो डेव्हलपमेंट प्लॅन (डीपीआर) मंजूर करून घेतला होता, तो २०१६ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरही अजूनपर्यंत मनपा तोच डीपी नियम पाळत आहे. त्यामुळे सुधारित डीपीआर बनवून, शासनाकडून मंजूर करवून घेणेही खूप गरजेचे आहे. तसेच यूआरडीएफआयच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.

---------------

केडीएमसीच्या सर्व विभागांचा भोंगळ कारभार लेखी तक्रारींद्वारे चव्हाट्यावर आणला आहे. त्या तक्रारींचे काय झाले? राजरोसपणे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. आरक्षित भूखंडांवर कारवाई होऊनही पुन्हा बांधकामे उभी राहत आहेत. त्यावर कोणीच कारवाई करत नाही. प्रभाग क्षेत्र अधिकारी बदलूनही उपयोग झालेला नाही. अशा बांधकामांना कोणाचा वरदहस्त आहे?

- कौस्तुभ गोखले, माहिती अधिकार कार्यकर्ते