शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पंडित भीमसेन जोशी यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो - विनायक टोरवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 15:28 IST

भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार विनायक टोरवी यांना प्रदान

डोंबिवली - 'पंडित भीमसेन जोशी हे फार कमी बोलत असत. परंतु त्यांचा एक-एक शब्द हा नेहमी एव्हरग्रीन होता. गायनाचा सराव हा 24 तास केला पाहिजे, असे ते सांगत असतं. चांगल्या गायकीसाठी मानसिक (मेन्टली) सरावाची गरज असते. आपण केवळ गात राहायचे मग सूर आपोआप मिळतात. त्यांनी सांगितलेल्या या मार्गावर मी चालत आहे'', असे मत सुप्रसिद्ध हिंदुस्थानी गायन क्षेत्रातील कलाकार विनायक टोरवी यांनी व्यक्त केले. 

जी.एस. बी. मंडळ यांच्यातर्फे कै. पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने पं. भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत संगीत क्षेत्रातील विशेष करून पंडितजींचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्याला पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा पुरस्कार हा पंडित टोरवी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. टोरवी म्हणाले, या पुरस्काराचा मी आनंदाने स्वीकार करीत आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी माझ्या गुरूंचा आशीवार्द आहे. रामायणात जसा राम हा अवतार पुरूष होता. त्याप्रमाणे पं. भीमसेन जोशी हे देखील एक अवतार पुरूष आहेत. त्यांच्या सारखा गाणारा कुणी झाला नाही आणि कुणी होणार ही नाही. गुरूजींचे गाणे हे वेगळे होते. जयपूर, किराणा अशी संगीतात खूप घराणे आहेत. पण पंडितजी स्वत:चा एक घराणो होते. त्यांचे शास्त्रीय संगीत लोकप्रिय होते. म्हणूनच त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अश्या या माङया गुरूसाठी माङयाकडे शब्दच नाहीत. माझ्या आई-वडिलांचा आणि गुरूचा आशीवार्द माझ्यामागे आहे. म्हणून मी येथेपर्यंतचा प्रवास करू शकलो. पंडितजी सारखा दुसरा कुणी ही नसल्याने त्यांच्यासारखे गाणं गळ्यात आणायचा प्रयत्न करीत आहे, असे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजेश पडियार यांनी अजित कडकडे यांचा कन्नड अभंग गजमुखाने जय तू गण ना धरे हा अभंग सादर केला.

त्यानंतर संत पुरंदर दासाचे भजन सादर केले. कृष्णाच्या लीला सांगणारे कन्नड भजन सादर केले. कविता शेनॉय यांनी संत तुकाराम यांनी लिखाण केलेले ‘बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव’ हा अभंग सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अनंत भट यांची रचना असलेली जय सुधीनेंद्र हा गुरूस्तूती करणारा अभंग सादर केला. संत एकनाथचा या पंढरीचे सुख पाहता डोळा हे गीत सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विनायक टोरवी यांनी पुराया कल्याण हा राग सादर केला. 

टोरवी यांना दत्तात्रय वेलणकर, सिद्धार्थ दणमून यांनी साथ दिली. टाळ मंजिरा रविंद्र शेनॉय, तबला सत्यविजय भट, संवादिनी प्रसाद कामत, पंखवाज शिवाजी बुधकर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय बाळ यांनी केले.

2022 मध्ये महोत्सव होणार तीन दिवसीयजीएसबी मंडळ ही संस्था गेल्या 36 वर्षे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम आयोजित करीत असते. संगीत क्षेत्रात गेल्या आठ वर्षापासून पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान वृध्दींगत होण्यासाठी संगीत समारोह आयोजित करीत आहे. 2022 मध्ये हा महोत्सव तीन दिवसीय करण्याचा मानस संस्थेच्या सुधीर नाईक यांनी व्यक्त केला.