शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पंडित भीमसेन जोशी यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो - विनायक टोरवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 15:28 IST

भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार विनायक टोरवी यांना प्रदान

डोंबिवली - 'पंडित भीमसेन जोशी हे फार कमी बोलत असत. परंतु त्यांचा एक-एक शब्द हा नेहमी एव्हरग्रीन होता. गायनाचा सराव हा 24 तास केला पाहिजे, असे ते सांगत असतं. चांगल्या गायकीसाठी मानसिक (मेन्टली) सरावाची गरज असते. आपण केवळ गात राहायचे मग सूर आपोआप मिळतात. त्यांनी सांगितलेल्या या मार्गावर मी चालत आहे'', असे मत सुप्रसिद्ध हिंदुस्थानी गायन क्षेत्रातील कलाकार विनायक टोरवी यांनी व्यक्त केले. 

जी.एस. बी. मंडळ यांच्यातर्फे कै. पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने पं. भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत संगीत क्षेत्रातील विशेष करून पंडितजींचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्याला पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा पुरस्कार हा पंडित टोरवी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. टोरवी म्हणाले, या पुरस्काराचा मी आनंदाने स्वीकार करीत आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी माझ्या गुरूंचा आशीवार्द आहे. रामायणात जसा राम हा अवतार पुरूष होता. त्याप्रमाणे पं. भीमसेन जोशी हे देखील एक अवतार पुरूष आहेत. त्यांच्या सारखा गाणारा कुणी झाला नाही आणि कुणी होणार ही नाही. गुरूजींचे गाणे हे वेगळे होते. जयपूर, किराणा अशी संगीतात खूप घराणे आहेत. पण पंडितजी स्वत:चा एक घराणो होते. त्यांचे शास्त्रीय संगीत लोकप्रिय होते. म्हणूनच त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अश्या या माङया गुरूसाठी माङयाकडे शब्दच नाहीत. माझ्या आई-वडिलांचा आणि गुरूचा आशीवार्द माझ्यामागे आहे. म्हणून मी येथेपर्यंतचा प्रवास करू शकलो. पंडितजी सारखा दुसरा कुणी ही नसल्याने त्यांच्यासारखे गाणं गळ्यात आणायचा प्रयत्न करीत आहे, असे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजेश पडियार यांनी अजित कडकडे यांचा कन्नड अभंग गजमुखाने जय तू गण ना धरे हा अभंग सादर केला.

त्यानंतर संत पुरंदर दासाचे भजन सादर केले. कृष्णाच्या लीला सांगणारे कन्नड भजन सादर केले. कविता शेनॉय यांनी संत तुकाराम यांनी लिखाण केलेले ‘बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव’ हा अभंग सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अनंत भट यांची रचना असलेली जय सुधीनेंद्र हा गुरूस्तूती करणारा अभंग सादर केला. संत एकनाथचा या पंढरीचे सुख पाहता डोळा हे गीत सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विनायक टोरवी यांनी पुराया कल्याण हा राग सादर केला. 

टोरवी यांना दत्तात्रय वेलणकर, सिद्धार्थ दणमून यांनी साथ दिली. टाळ मंजिरा रविंद्र शेनॉय, तबला सत्यविजय भट, संवादिनी प्रसाद कामत, पंखवाज शिवाजी बुधकर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय बाळ यांनी केले.

2022 मध्ये महोत्सव होणार तीन दिवसीयजीएसबी मंडळ ही संस्था गेल्या 36 वर्षे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम आयोजित करीत असते. संगीत क्षेत्रात गेल्या आठ वर्षापासून पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान वृध्दींगत होण्यासाठी संगीत समारोह आयोजित करीत आहे. 2022 मध्ये हा महोत्सव तीन दिवसीय करण्याचा मानस संस्थेच्या सुधीर नाईक यांनी व्यक्त केला.