शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गावे होणार टंचाईमुक्त, साकडबावमध्ये जागृती, ‘वसुंधरा’चे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:19 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात एप्रिल आणि मे हे महिने पाणीटंचाईचे. त्यामुळेच धरणे असूनही पाण्यासाठी वणवण करणे ग्रामस्थांच्या नशिबी येते

अश्विनी भाटवडेकर ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात एप्रिल आणि मे हे महिने पाणीटंचाईचे. त्यामुळेच धरणे असूनही पाण्यासाठी वणवण करणे ग्रामस्थांच्या नशिबी येते. दरवर्षीचा हा त्रास दूर करण्याचे वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे गावकऱ्यांमध्ये जागृती करून वनराई बंधारे बांधले देखील. आता या बंधाऱ्यातील पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत तरी निश्चितच पुरेल, असे ‘वसुंधरा’चे पवन वाडे सांगतात.

शहापूर तालुक्यातील धरणांना लागूनच असलेले एक गाव, साकडबाव. गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजार. यंदा तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाण्याचा त्रास सुरू झाला. येथेही टंचाई भेडसावू लागली. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मदतीने शिकणाºया विद्यार्थ्यांनी ही बाब वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. त्यांनी देखील याची दखल घेत परिस्थितीची पाहणी केली. आणि सुरुवातीला तात्पुरता उपाय म्हणून वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी लोकांकडूनच श्रमदान करून घेण्याचे ठरवले. त्यादृष्टीने लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, याबाबत त्यांना माहिती दिली. आणि मग लोकांच्या मदतीने सिमेंटच्या पिशव्यांच्या सहाय्याने या कार्यकर्त्यांनी येथे ३ वनराई बंधारे बांधले. ज्यायोगे येथे पाणी साठून रहायला लागले. हेच पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत तरी निश्चितच पुरेल असा विश्वास वसुंधराच्या कार्यकर्त्यांना आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्तचा प्रश्न तरी सध्या थोड्याफार प्रमाणात सुटल्याचे वाडे यांचे म्हणणे आहे.

यापुढचा टप्पा म्हणजे चेक डॅम. वनराई बंधाऱ्यांच्या तुलनेत हा अधिक भक्कम असतो. आणि जास्त पाणी साठून राहण्यास मदत होते. वास्तविक, शहापूर तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती. वर्षभर ही शेती करता यावी, लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. यादृष्टीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, त्यांना अशाप्रकारे पाणी साठवून ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम सुरू असून ग्रामस्थांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगतात.

शहापूर तालुक्यात हे काम सुरू करण्यापूर्वी या संस्थेने मुरबाड तालुक्यातही काम केले.शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडतो. पण येथे पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. हे वाहते पाणी अडवण्याची काही ना काही सोय हवी. अनेक सरकारी योजना तर लोकांना ठाऊकच नाहीत. त्याबाबतही जनजागृती व्हायला हवी.अलीकडे सर्रास बोरवेल खोदल्या जातात. यासाठी ड्रिलिंग करावे लागत असल्याने हे पर्यावरणाला हानीकारक आहे. त्यामुळेच हा बंधाºयांचा पर्याय अत्यंत उत्तम आणि तुलनेने सोपा आहे.