शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गावखेडी जोडणार सॅटेलाइटद्वारे, मुंबईसह पालघर- ठाण्यावरील नैसर्गिक संकटांवर मात करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 1:00 AM

मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीला समुुद्रातील चक्रीवादळांपासून धोका आहे, या चर्चेस नुकत्याच झालेल्या ‘महा’ चक्रीवादळापासून महत्त्व आले.

- सुरेश लोखंडेठाणे : मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीला समुुद्रातील चक्रीवादळांपासून धोका आहे, या चर्चेस नुकत्याच झालेल्या ‘महा’ चक्रीवादळापासून महत्त्व आले. यावर केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करून संभाव्य नैसर्गिक आपत्तीवर तत्काळ मात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून यासाठी ठाण्यासह भिवंडी तालुक्यातील गावखेडी सॅटेलाइट प्रकल्पाद्वारे जोडण्यासाठी चाचपणीही केली आहे.मुंबईसह पालघर व ठाणे शहरास चोहोबाजूने समुद्राने वेढले आहे. त्यास लागून पालघर व ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहरांसह गावे आहेत. त्यांचे समुद्रातील चक्रीवादळांपासून नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यावर वेळीच मात करणे शक्य व्हावे, यासाठी उद्भवणाऱ्या आपत्तीची माहिती वेळीच मिळावी आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करता याव्यात, या दृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू आहेत.यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाद्वारे दुर्गा प्रसाद नावाच्या अधिकाºयाने सॅटेलाइट प्रकल्पांसाठी भिवंडी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या गावखेड्यांची दोन दिवसांपूर्वी चाचपणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ही योजना प्रत्यक्षात आल्यास किनारपट्टीवरील गावांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.संभाव्य धोक्यांची दोन दिवसांपूर्वी झाली चाचपणीअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन नुकतेच क्यार व महा या नावाची जीवघेणी चक्रीवादळे तयार झाली होती. यातील क्यारपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर, ‘महा’ धोकादायक चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशासनासह महापालिका, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायती पातळीवरील यंत्रणांना तत्काळ सतर्क केले होते. संभाव्य ठिकाणी जिल्हा प्रशासनाने रेड अलर्टही जारी केले.यासाठी केंद्रीय कार्यालयाद्वारे राज्यासह जिल्हा आणि तालुकापातळीच्या यंत्रणेपर्यंत जावे लागले. मात्र, सॅटेलाइट प्रकल्पास जोडल्यानंतर तत्काळ संबंधित ठिकाणी वेळीच संपर्क करून त्यास संभाव्य धोक्याची, आपत्तीची माहिती देणे शक्य होणार आहे. या दृष्टीने ठाणे, भिवंडी शहरांसह गावखेडे, समुद्रकाठावरील बंदरांची चाचपणी सुरू आहे. यानुसार, दोन दिवसांपूर्वी भिवंडीसह उत्तनसारख्या बंदराची प्राथमिक चाचपणी झाली.उत्तन-डहाणू, सातपाटी यांसारख्या बंदरांना मिळणार संरक्षणकेंद्रीय आपत्ती नियंत्रण विभागास मिळणारी नैसर्गिक आपत्ती, संकटाची माहिती संबंधित जिल्ह्यास, तालुक्यास आणि ग्रामपंचायत विभागास तत्काळ कळवता यावी, यासाठी येथील कार्यालये वॉकीटॉकी, सॅटेलाइट प्रकल्पास जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यामुळे समुद्रातील चक्रीवादळांसारख्या संकटांसह अन्यही नैसर्गिक संकटांची माहिती तत्काळ संबंधित उत्तन, डहाणू, सातपाटीसारखी मच्छीमार बंदरे, शहरे आणि गावखेड्यांना देऊन संरक्षण करता येईल.त्यावर वेळीच उपाययोजना शोधून संभाव्य धोक्यावर मात करणे शक्य होईल. यासाठी शहरांसह गावेदेखील सॅटेलाइट, वॉकीटॉकी यासारख्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानास जोडण्यासाठी जिल्ह्यातील गावखेड्यांची चाचपणी करून सर्वेक्षणाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईVasai Virarवसई विरार