शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 18:26 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.

- अजित मांडके

ठाणे : नवरात्रीत शिवसेना आणि भाजपच्या युती बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, युती झाली किंवा नाही, तरी ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी गेल्या 9 महिन्यांपूर्वीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी भाजपचा आमदार असेल, त्या ठिकाणी शिवसेनेत इच्छुकांची चाचपणीही आली असून या माध्यमातून भाजपवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. परंतु, युती तुटली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सर्व्हेत समोर आली आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी असली तरी विद्यमान आमदारांना फुटण्यापासून वाचविण्याचे आव्हानही पक्षासमोर आहे.युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. त्यात काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास ठाणे शहर विधानसभा क्षेत्र मिळावे, यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांमध्ये त्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. मात्र, युती तुटलीच तर या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल, हे नावही अंतिम झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, युती झाली तरीही ही जागा मिळावी यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असून त्या बदल्यात दोन वर्षांनी लागणाऱ्या विधानपरिषदेची जागा सोडण्यास पक्ष तयार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. त्यामुळे भाजपने ही जागा सोडल्यास विद्यमान आमदार संजय केळकर यांचे विधानपरिषदेवर  केले जाणार आहे.

दुसरीकडे, मागील वेळेस शिवसेना गाफील राहिल्याने, शिवसेनेला ऐन वेळेस स्वबळावर निवडणूक लढवून उमेदवारांची शोधाशोध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत पक्षातील प्रत्येक उच्चपदस्थ सदस्याबरोबर साध्या कार्यकर्त्याला देखील गाफील न राहण्याचा सल्ला देण्यात आला असून गेल्या नऊ महिन्यांपासूनच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी काहींचा प्रवेशही लांबणीवर टाकला आहे. युती तुटली तर अशा आपल्या पक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी देण्याची तयारीही जिल्ह्यातील काही मतदारसंघात सुरु आहे. शिवाय, काही इच्छुकांना आधीपासूनच तयारी करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील काही मतदारसंघातील उमेदवार देखील शिवसेनेकडून अंतिम झाले आहेत. मात्र, युती तुटली तरच त्यांची नावे घोषित केली जाणार असल्याची माहितीही शिवसेनेच्या सुत्रांनी दिली. ज्या ठिकाणी जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा दिसत आहे, त्याठिकाणी कुरघोडीचे राजकारण खेळण्याची रणनितीसुद्धा शिवसेनेने आखली होती. त्यानुसार ठाण्यासह जिल्ह्यातील अशा काही मतदारसंघात त्याचे पडसादही मागील काही महिन्यात उमटल्याचे दिसून आले.

संभाव्य फुटीमुळे शिवसेना सावधएकीकडे युती तुटली तर स्वबळाची तयारी शिवसेनेने केली असली तरी त्यांच्याच पक्षातील काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यताही त्यांना सतावत आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार आहेत, तर भाजपचे सात आणि एक अपक्ष असे आठ आमदार आहेत. त्यात युती तुटली तर शिवसेनेचे दोन आमदार वेगळा घरोबा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोघांचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंशी फारसे पटत नाही. ते फुटल्यास ‘ग्रामीण’ भागातही भाजपाचे ‘कल्याण’ होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या नेत्यांना असा ‘प्रताप’ करणाऱ्यांची नावे सुद्धा माहीत आहेत, त्यामुळे हे दोन्ही आपले नव्हतेच म्हणून त्यांनी तयारी स्वबळाची ठेवली असली तर उद्या जर ते फुटून भाजपत जावून निवडून आले तर शिवसेनेचा जिल्ह्यावरील वरचष्मा कमी होऊन भाजपचे जिल्ह्यात १० आणि शिवसेनेचे चार आमदार निवडून येण्याची चिंता पक्षाला सतावत आहे. हे पचविता न येण्यासारखे असल्यामुळे शिवसेनेने सध्या तरी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणेvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019