शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाजपेयींच्या कविता मार्गदर्शक- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:06 IST

सर्वपक्षीय श्रद्धांजली, कवितांमधून जीवनाकडे पाहण्यास शिकवले

ठाणे : भारतरत्न तथा माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी केवळ विचारांमधूनच नाहीतर, आपल्या कवितांमधून देशाकडे आणि जीवनाकडे पाहण्यास शिकवले, असे उद्गार काढत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी अटलजी यांच्या कवितासंग्रहातील निवडक कविता गायिका पद्मजा फेणाणी यांनी सादर करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.नेता म्हणून आपल्यासमोर कसे व्यक्तिमत्त्व हवे, तर ते अटलजींसारखे हवे, असे बोलत देशाप्रति नागरिकांची भक्ती कशी असावी, हे त्यांनी कवितांमधून दाखवून दिले. त्यांच्या कविता पुढील पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. डोंबिवली आणि अटलजींचे एक आगळेवेगळे नाते असल्याने ते विविध कार्यक्रमांसाठी डोंबिवलीत येत. त्यामुळेच त्यांचे विचार कार्यकर्त्यांना लाभल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहताना, शब्दच अपुरे पडले असते, यामुळे त्यांच्या कवितांमधूनच त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, रवींद्र फाटक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत चव्हाण, रवी मोरे यासह नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा