शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 01:16 IST

ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने समसमान जागा घेतल्या आहेत. परंतु, भाजपच्या ज्याज्या मतदारसंघात उत्तर भारतीय बांधव वास्तव्य करून आहेत.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने समसमान जागा घेतल्या आहेत. परंतु, भाजपच्या ज्याज्या मतदारसंघात उत्तर भारतीय बांधव वास्तव्य करून आहेत. त्यांची मते मिळविण्यासाठी भाजपने थेट उत्तर प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांना पाचारण केले असून तेच या जिल्ह्यातील भाजपच्या मतदारसंघात प्रभारी व निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.जिल्ह्यात आता इतर भाषिकांचाही टक्का वाढला आहे. ठाणे असो किंवा डोंबिवली किंवा जिल्ह्याचा ग्रामीण भाग या सर्वच ठिकाणी परप्रांतीय मतदारांचा टक्का हा वाढलेला आहे. पूर्वी हा मतदार फारसा महत्त्वाचा मानला जात नव्हता. मात्र, आता त्यालाही मागील काही वर्षांत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा टक्का आपल्याकडे खेचण्यासाठी आता भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याने भाजपलाच मतदान करावे, हे समजावण्यासाठीच पक्षाने उत्तर प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची टीमच जिल्ह्यात दाखल केली आहे. उत्तर प्रदेशचे महत्त्वाचे पदाधिकारी जिल्ह्यात ज्याज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. त्यात्या ठिकाणी प्रभारी आणि निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. यासाठी काही स्थानिक परप्रांतीय पदाधिकाºयांची मदत घेऊन हे निरीक्षक या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहेत. त्यानुसार, ठाणे शहरात अरुण कुमार सिंह हे उत्तर प्रदेश भाजपचे कार्यकारी सदस्य सध्या ठाण्याच्या परप्रांतीयांची वस्ती असलेल्या भागात सक्रिय झाले असून या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहेत.अगोदरच केला अभ्यासमराठी, गुजराथी, मुस्लिम आदींसह इतर भाषिकांची मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघात कोणत्या भाषिक मतदारांचा टक्का अधिक आहे, याचा अभ्यासही यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय पातळीवरील समितीने केला आहे. त्या अनुषगांने आता प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलचे काम सुरूकेले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे