शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेकडून प्रभावी औषधाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 19:58 IST

मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे.

- राजू काळे 

भार्इंदर, दि. २१ - मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे.

शहरात अनेक ठिकाणे दलदलीची व त्यात वाढणा-या वनस्पतींची आहेत. तसेच शहरात मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरु असून अशा ठिकाणी साठणा-या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होत असल्याचे पालिकेने वेळोवेळी केलेल्या सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे. याउलट डेंगी (एडिस) हा डास तर स्वच्छ व अगदी कमी पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे शहरात अनेकांना डेंग्युची लागण झाल्याचे वेळोवेळी समोर येते. त्यातही काही रुग्ण डेंग्युच्या आजाराने मरण पावतात. अशा डासांना तसेच त्यांच्या अळ्या व अंड्यांना नष्ट करण्यासाठी पालिकेकडून यापूर्वी किटकनाशक औषधांची फवारणी केली जात होती. परंतु, हा तात्पुरता प्रभाव ठरत असल्याने डासांच्या उत्पत्तीत कोणताही फरक न पडता त्यांचा प्रादुर्भाव सतत वाढतो आहे. दरम्यान डासांच्या उत्पत्तीला लगाम घालणारे डायफ्लूबेंजिरॉन औैषध गोळीच्या स्वरुपात परदेशात शोधून काढण्यात आले. तेथे त्या गोळीचा वापर प्रभावशाली ठरु लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) त्याला मान्यता दिली. त्या गोळ्यांचा वापर सध्या भारतातील काही ठिकाणी केला जात असल्याचा दावा केला जात आहे. गोळीची माहिती मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासनालाा मिळाल्याने त्या गोळीचा प्रभाव प्रभाव स्वच्छता विभागाकडून तपासण्यात आला. त्यात गोळी प्रभावी ठरल्याने पालिकेने त्या गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय नुकताच घेतला. ही गोळी उघड्यावर साठलेल्या स्वच्छ तसेच अस्वच्छ पाण्यात टाकता येते. मात्र त्याचे प्रमाण प्रती ४० लीटर पाण्यामागे एक गोळी असे आहे. या गोळीमुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया, झिका वायरस या डासांच्या अळ्या व अंडी नष्ट होत असल्याने वेगवेगळ्या डासांसाठी वेगवेगळे औषध वापरण्याची आवश्यकता नाही. आजही पालिका डास उत्पत्तीच्या काही ठिकाणी औषध फवारणी करतात. कारण गलिच्छ तसेच झोपडपट्टीतील रहिवाशी पाण्याच्या समस्येमुळे उघड्यावर पाणी साठवून ठेवतात. त्यात मोठ्याप्रमाणात डेंगी डासाच्या अळ्या अनेकदा आढळून आल्या आहेत. तरीदेखील साठविलेले पाणी टाकून देण्यास ते रहिवाशी विरोध करतात. त्यातच त्यामध्ये किटकनाशक औषध फवारणीला देखील मज्जाव करतात. त्यामुळे पालिकेच्या औषध फरवारणी मोहिमेत अडथळा निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणुन या गोळ्यांची मात्रा प्रभावी ठरु लागली आहे. गोळ्या पिण्याच्या पाण्यातही टाकता येत असल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, भारतात त्याला अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर