शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेकडून प्रभावी औषधाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 19:58 IST

मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे.

- राजू काळे 

भार्इंदर, दि. २१ - मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे.

शहरात अनेक ठिकाणे दलदलीची व त्यात वाढणा-या वनस्पतींची आहेत. तसेच शहरात मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरु असून अशा ठिकाणी साठणा-या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होत असल्याचे पालिकेने वेळोवेळी केलेल्या सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे. याउलट डेंगी (एडिस) हा डास तर स्वच्छ व अगदी कमी पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे शहरात अनेकांना डेंग्युची लागण झाल्याचे वेळोवेळी समोर येते. त्यातही काही रुग्ण डेंग्युच्या आजाराने मरण पावतात. अशा डासांना तसेच त्यांच्या अळ्या व अंड्यांना नष्ट करण्यासाठी पालिकेकडून यापूर्वी किटकनाशक औषधांची फवारणी केली जात होती. परंतु, हा तात्पुरता प्रभाव ठरत असल्याने डासांच्या उत्पत्तीत कोणताही फरक न पडता त्यांचा प्रादुर्भाव सतत वाढतो आहे. दरम्यान डासांच्या उत्पत्तीला लगाम घालणारे डायफ्लूबेंजिरॉन औैषध गोळीच्या स्वरुपात परदेशात शोधून काढण्यात आले. तेथे त्या गोळीचा वापर प्रभावशाली ठरु लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) त्याला मान्यता दिली. त्या गोळ्यांचा वापर सध्या भारतातील काही ठिकाणी केला जात असल्याचा दावा केला जात आहे. गोळीची माहिती मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासनालाा मिळाल्याने त्या गोळीचा प्रभाव प्रभाव स्वच्छता विभागाकडून तपासण्यात आला. त्यात गोळी प्रभावी ठरल्याने पालिकेने त्या गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय नुकताच घेतला. ही गोळी उघड्यावर साठलेल्या स्वच्छ तसेच अस्वच्छ पाण्यात टाकता येते. मात्र त्याचे प्रमाण प्रती ४० लीटर पाण्यामागे एक गोळी असे आहे. या गोळीमुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया, झिका वायरस या डासांच्या अळ्या व अंडी नष्ट होत असल्याने वेगवेगळ्या डासांसाठी वेगवेगळे औषध वापरण्याची आवश्यकता नाही. आजही पालिका डास उत्पत्तीच्या काही ठिकाणी औषध फवारणी करतात. कारण गलिच्छ तसेच झोपडपट्टीतील रहिवाशी पाण्याच्या समस्येमुळे उघड्यावर पाणी साठवून ठेवतात. त्यात मोठ्याप्रमाणात डेंगी डासाच्या अळ्या अनेकदा आढळून आल्या आहेत. तरीदेखील साठविलेले पाणी टाकून देण्यास ते रहिवाशी विरोध करतात. त्यातच त्यामध्ये किटकनाशक औषध फवारणीला देखील मज्जाव करतात. त्यामुळे पालिकेच्या औषध फरवारणी मोहिमेत अडथळा निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणुन या गोळ्यांची मात्रा प्रभावी ठरु लागली आहे. गोळ्या पिण्याच्या पाण्यातही टाकता येत असल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, भारतात त्याला अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर