शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेकडून प्रभावी औषधाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 19:58 IST

मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे.

- राजू काळे 

भार्इंदर, दि. २१ - मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे.

शहरात अनेक ठिकाणे दलदलीची व त्यात वाढणा-या वनस्पतींची आहेत. तसेच शहरात मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरु असून अशा ठिकाणी साठणा-या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होत असल्याचे पालिकेने वेळोवेळी केलेल्या सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे. याउलट डेंगी (एडिस) हा डास तर स्वच्छ व अगदी कमी पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे शहरात अनेकांना डेंग्युची लागण झाल्याचे वेळोवेळी समोर येते. त्यातही काही रुग्ण डेंग्युच्या आजाराने मरण पावतात. अशा डासांना तसेच त्यांच्या अळ्या व अंड्यांना नष्ट करण्यासाठी पालिकेकडून यापूर्वी किटकनाशक औषधांची फवारणी केली जात होती. परंतु, हा तात्पुरता प्रभाव ठरत असल्याने डासांच्या उत्पत्तीत कोणताही फरक न पडता त्यांचा प्रादुर्भाव सतत वाढतो आहे. दरम्यान डासांच्या उत्पत्तीला लगाम घालणारे डायफ्लूबेंजिरॉन औैषध गोळीच्या स्वरुपात परदेशात शोधून काढण्यात आले. तेथे त्या गोळीचा वापर प्रभावशाली ठरु लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) त्याला मान्यता दिली. त्या गोळ्यांचा वापर सध्या भारतातील काही ठिकाणी केला जात असल्याचा दावा केला जात आहे. गोळीची माहिती मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासनालाा मिळाल्याने त्या गोळीचा प्रभाव प्रभाव स्वच्छता विभागाकडून तपासण्यात आला. त्यात गोळी प्रभावी ठरल्याने पालिकेने त्या गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय नुकताच घेतला. ही गोळी उघड्यावर साठलेल्या स्वच्छ तसेच अस्वच्छ पाण्यात टाकता येते. मात्र त्याचे प्रमाण प्रती ४० लीटर पाण्यामागे एक गोळी असे आहे. या गोळीमुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया, झिका वायरस या डासांच्या अळ्या व अंडी नष्ट होत असल्याने वेगवेगळ्या डासांसाठी वेगवेगळे औषध वापरण्याची आवश्यकता नाही. आजही पालिका डास उत्पत्तीच्या काही ठिकाणी औषध फवारणी करतात. कारण गलिच्छ तसेच झोपडपट्टीतील रहिवाशी पाण्याच्या समस्येमुळे उघड्यावर पाणी साठवून ठेवतात. त्यात मोठ्याप्रमाणात डेंगी डासाच्या अळ्या अनेकदा आढळून आल्या आहेत. तरीदेखील साठविलेले पाणी टाकून देण्यास ते रहिवाशी विरोध करतात. त्यातच त्यामध्ये किटकनाशक औषध फवारणीला देखील मज्जाव करतात. त्यामुळे पालिकेच्या औषध फरवारणी मोहिमेत अडथळा निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणुन या गोळ्यांची मात्रा प्रभावी ठरु लागली आहे. गोळ्या पिण्याच्या पाण्यातही टाकता येत असल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, भारतात त्याला अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर