शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

पुनर्वसन होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मांडण्याचा श्रमजीवींचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 8:22 PM

येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही

ठळक मुद्देशासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडलेघराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणीपुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धार

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेतावली येथील १३ कातकरी कुटुंबियांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने येथील ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बि-हाड मोर्चा काढून धरणे आंदोलन सुरू केले. घराची जागा नावे करून देण्याची जोरदार मागणी करून पुनर्वसन होईपर्यंत येथे बि-हाड मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.       येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या मोर्चेकरांची भेट घेण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या या मोर्चेकरांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बिºहाड मांडून बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावर प्रशासन काय निर्णया घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.       नेतावली येथील कातकरी समाजाच्या १३ आदिवासी कुटुंबियांचा हा बि-हाड मोर्चाचे आता बेमुदत बिºहाडासह धरणे आंदोलनात रूपांतर झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत तरी श्रमजीवींचे हे धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलकांकडून आदिवासी माणूस ढोर नाय ... माणूस हाय ... माणूस हाय, माणूसकीची भीक नको... हक्क हवा... हक्क हवा, या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुली पेटवून अन्न शिजवण्याची तयारी देखील या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

      बेघर झालेल्या या अदिवासी कातकरी कुटुंबांचे तत्काळ पुर्नवसन करा, कातकरी उत्थान अभियानातंर्गत कुळ कायदा १९४८ चे कलम १६ व १७ प्रमाणे घराखालील जागा त्यांच्या नावे करावी, बेघर केलेल्या आदिवासींना तात्पुरती निवासाची व्यवस्था करा, विकासक व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे आदी मागण्या यावेळी आंदोलकांकडून निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. यावेळी या कुटुंबाचा प्रश्न सोडविण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यास २६ जानेवारी या प्रजास्ताक दिनी १३ कुटुंबिये या श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करणार असल्याची भोईर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी