शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अभूतपूर्व वाहतूककोंडी, २०० मीटरचे अंतर पार करण्याकरिता एक तास ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 07:10 IST

शाळेत पोहोचायला उशीर झाल्याने बस, रिक्षांतील लहान शालेय विद्यार्थ्यांना रडू कोसळले. 

ठाणे  : गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यात सुरू असलेल्या वाहतूककोंडीचा दारुण अनुभव शुक्रवारी पुन्हा आला. हजारो ठाणेकर चाकरमानी आणि शालेय विद्यार्थी कोंडीत अडकल्याने त्यांना कार्यालये, शाळा गाठण्यास विलंब झाला. शाळेत पोहोचायला उशीर झाल्याने बस, रिक्षांतील लहान शालेय विद्यार्थ्यांना रडू कोसळले. 

पाऊस आणि रस्त्यांना अवघ्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने पडलेले मोठे खड्डे यांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.घोडबंदरच्या भाईंदरपाड्यापर्यंत ही रांग आली होती. तीन हात नाक्यावरही कोंडी झाली होती. जेमतेम २०० मीटरचे अंतर पार करण्याकरिता एक तास लागत होता.

नोकरदारांनी वाहिली लाखोलीशाळेत लेटमार्क लागेल या भीतीने काही लहान मुले शाळेच्या बस, रिक्षात रडू लागली. दुपारच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या मुलांनाही वाहतूक कोंडीने अक्षरश: रडवले. कामावर जाणाऱ्या हजारो ठाणेकर नोकरदारांनाही कोंडीने त्रस्त केले. ठाण्याहून नवी मुंबई, मुंबई व कल्याणच्या दिशेला नोकरीनिमित्त हजारो ठाणेकर जातात. काहींनी वाहतुकीचा रांग पाहून अर्ध्या रस्त्यातून घरी परतणे पसंत केले. रस्त्यावरील खड्ड्यांच्या नावाने ते लाखोली वाहत होते.

खड्डे बुजविण्याच्या कामांचा वाहतुकीला फटका वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता भिवंडी मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम गुरुवारी रात्रीपासून हाती घेतल्यामुळे ही कोंडी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच साकेतपुढील सिग्नल यंत्रणा वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बंद ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने होणारी वाहतूक साकेत पूल ते माजीवडा नाक्यापासून अगदी घोडबंदर कासारवडवली नागला बंदरपर्यंत ठप्प झाली होती. भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते भिवंडीतील रांजनोली नाका येथपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ ते २० मिनिटांचे अंतर पार करण्यास वाहनांना तब्बल  दोन  तास लागत होते. याचा सर्वाधिक फटका सकाळच्या वेळेस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. 

केवळ तीन दिवसांच्या पावसाने ठाण्यातील रस्त्यांची चाळण केली आहे. घोडबंदर मार्गांवरील बोरिवलीच्या मार्गिकेवर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातच सकाळी जोरदार पाऊस झाल्याने  येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग कमालीचा मंदावला. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. 

वाहतूक सुरळीत असताना रस्त्यांवर उभे असलेले वाहतूक पोलीस शुक्रवारी कुठेच दिसले नाहीत. स्थानिक नागरिक आणि काही रिक्षाचालक यांनी रस्त्यावर उतरून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी