शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा भिवंडीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 22:08 IST

भिवंडी - भिवंडी लोकसभेचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्याच्याकडे ...

भिवंडी- भिवंडी लोकसभेचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्याच्याकडे केंद्रीय पंचायत राज मंत्री पदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांनी १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहून आपल्या खात्याविषयी माहिती घ्यावी, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील हे तब्बल चाळीस दिवसांनंतर १६ ऑगस्ट रोजी मुंबईत परतले. १६ ते २० ऑगस्ट, अशी पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा आहे. मुंबईहून सुरू झालेली ही यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यातून जात आहे. या यात्रेसोबत पाटील हे गुरुवारी तब्बल 44 दिवसांनंतर भिवंडीत दाखल झाले. 

गुरुवारी सायंकाळी कपिल पाटील भिवंडीत दाखल झाले . सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावर वडपे गावाच्या हद्दीत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर रांजणोली नाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर त्यांनी साईबाबा मंदिरात साईंचे दर्शन घेत पुढे नवी वस्ती, धर्मवीर चौक, जुनी महापालिका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत वंजारपट्टीनाका मार्गे छ. शिवाजी महाराज चौक येथे छ. शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर टिळक चौक , मंडई , गौरी पाडा , धामणकर नाका , कामतघर , ताडाळी मार्गे अंजूरफाटा, अशी जण आशीर्वाद यात्रा संपन्न झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषात कपिल पाटील यांचे स्वागत केले.

गुरुवारी दिवसभर पावसाने रिमझिम हजेरी लावली असतांनाही भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने कपिल पाटील यांचे भिवंडी शहरात स्वागत केले. तर रिमझिम पावसामुळे मंत्री कपिल पाटील यांनी रेनकोट परिधान करून शहरवासीयांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान या जन आशीर्वाद यात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती, तर भिवंडी पोलिसांच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.           

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडी