शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

...अन् केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील सरपंचांच्या खुर्चीला केला वाकून नमस्कार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 20:40 IST

"ग्राम पंचायत सरपंच ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्नसुध्दा मी कधी पाहिले नव्हते."

नितिन पंडीत -

भिवंडी- केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर या त्यांच्या मूळगावी झाला. गावात भव्य स्वागत झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबियांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथील ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच खुर्चीस वंदन केले. 

यावेळी पाटील भावनीक झाल्याने त्यांना गहिवरून आले होते. कपिल पाटील यांनी १९८८ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा दिवे अंजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून केला होता. यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विविध पदे भूषवित थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाला गवसणी घातली.

ग्राम पंचायत सरपंच ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्नसुध्दा मी कधी पाहिले नव्हते. परंतु गावाच्या ग्रामस्थांनी १९८८ मध्ये व्यक्त केलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरविल्याने कुटुंबियांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाची पोच पावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने, ही संधी मला मिळाली, अशी प्रतिक्रिया देत वर्षानुवर्षे स्थित्यंतर होत गेली, आधुनिक खुर्ची आली असली तरी सरपंच पदाची मी उपभोगलेली ही खुर्ची असल्याने त्यास वंदन करण्यास आपण आलो असल्याचे मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

पाच दिवस जन आशीर्वाद यात्रेचा समारोप करीत असतानाच तब्बल दीड महिन्यानंतर आपल्या घरी परतणाऱ्या कपिल पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडी