शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

...अन् केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील सरपंचांच्या खुर्चीला केला वाकून नमस्कार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 20:40 IST

"ग्राम पंचायत सरपंच ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्नसुध्दा मी कधी पाहिले नव्हते."

नितिन पंडीत -

भिवंडी- केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर या त्यांच्या मूळगावी झाला. गावात भव्य स्वागत झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबियांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथील ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच खुर्चीस वंदन केले. 

यावेळी पाटील भावनीक झाल्याने त्यांना गहिवरून आले होते. कपिल पाटील यांनी १९८८ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा दिवे अंजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून केला होता. यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विविध पदे भूषवित थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाला गवसणी घातली.

ग्राम पंचायत सरपंच ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्नसुध्दा मी कधी पाहिले नव्हते. परंतु गावाच्या ग्रामस्थांनी १९८८ मध्ये व्यक्त केलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरविल्याने कुटुंबियांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाची पोच पावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने, ही संधी मला मिळाली, अशी प्रतिक्रिया देत वर्षानुवर्षे स्थित्यंतर होत गेली, आधुनिक खुर्ची आली असली तरी सरपंच पदाची मी उपभोगलेली ही खुर्ची असल्याने त्यास वंदन करण्यास आपण आलो असल्याचे मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

पाच दिवस जन आशीर्वाद यात्रेचा समारोप करीत असतानाच तब्बल दीड महिन्यानंतर आपल्या घरी परतणाऱ्या कपिल पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडी