शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव होणार भिवंडीत - कपिल पाटील 

By नितीन पंडित | Updated: March 9, 2023 18:47 IST

देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत होणार असल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. 

भिवंडी : भारतातील पहिले आदिवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले असून पहिले आदिवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती पाटील यांच्या कार्यालयाकडून गुरुवारी देण्यात आली आहे.

जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौर ऊर्जेचा वापर केला जात असून, ग्रामपंचायतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत. या गावात ५०० किलोवॅटचा सोलर प्लांट बसविला आहे. त्याच धर्तीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन आदिवासी गावे व १३ ग्रामपंचायती कार्बन न्यूट्रल करण्याचा निर्धार केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. त्यानुसार या संदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

बचतगटाच्या कार्यशाळा व सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अंजुरदिवे येथे बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही उपस्थिती होती. या गावांच्या आराखड्याबद्दल ₹ गिरीराज सिंह यांनी समाधान व्यक्त करून काही सुचना केल्या असून या प्रकल्पासाठी निधी देण्याचे जाहीर केले असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दुधनी व अखिवली वाफे या आदिवासी गावांबरोबरच, भिवंडी तालुक्यातील सोनाळे, रांजणोली, अंजुर, दिवे अंजुर, काल्हेर, कशेळी, कोपर, पुर्णा, दापोडे, राहनाळ, वळ, माणकोली, ओवळी आदी गावे कार्बन न्यूट्रल गावे करण्याचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पात प्रत्येक घराला अत्यल्प किंमतीत वीज उपलब्ध होणार घरांमध्ये सौरचुली, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गावात सोकपीट, सुक्या व ओल्या कचऱ्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील