शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

फ्लोअरिंगचे विनापरवाना बांधकाम: रहिवाशाच्या मृत्यूप्रकरणी दोन वर्षांनी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:43 IST

घराच्या छताला भेगा पडून गळतीही लागलेली असल्याची बाब निदर्शनास आणूनही इमारतीचा मालक तथा बिल्डर रजनीकांत पाठारे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फ्लोअरिंगचे बेकायदेशीरपणे काम केले. यातूनच छत कमकुवत झाल्याने बबलू भरत घोष (५३) यांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वीच्या या घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पाठारे यांच्याविरुद्ध दोन वर्षांनी दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे घराच्या छताला गळतीही लागल्याची बाब निदर्शनास आणूनही केले दुर्लक्षबिल्डरविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : फ्लोअरिंगच्या बेकायदेशीर बांधकामामुळे घराचे छत कमकुवत होऊन बबलू भरत घोष (५३) यांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी बाणी घोष (४६) या गंभीर जखमी होऊन ८० टक्के अपंग झाल्या होत्या. याप्रकरणी दोन वर्षांनी या दाम्पत्याचा मुलगा अमित घोष (२९, बी.आर.नगर, दिवा, ठाणे) यांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दिवा येथील अमित घोष हे किसननगर येथे विजय निवास या पाच मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये वर्षभरापूर्वी वास्तव्याला होते. त्यांच्या २०१ क्रमांकाच्या खोलीवर रजनीकांत पाठारे हे ३०१ क्रमांकाच्या खोलीमध्ये वास्तव्याला होते. पाठारे हेच या इमारतीचे बिल्डर आणि मालकही आहेत. २०१७ मध्ये घोष यांच्या घराच्या छताला भेगा पडून गळतीही लागलेली होती. ही बाब त्यांनी पाठारे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पाठारे यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करीत उलट त्यांनी त्यांच्या फ्लोअरिंगचे दोन ते तीनवेळा विनापरवाना काम केले. त्यावर अतिरिक्त बांधकामही केले. त्यामुळे घोष यांच्या छतावर अतिरिक्त वजन वाढून ते कमकुवत झाले होते. ही बाबही घोष यांनी पाठारे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले होते.दरम्यान, २४ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घोष यांच्या घराचे छत अचानक कोसळले. त्याच्या ढिगाºयाखाली दबल्याने अमित यांचे वडील भरत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आई बाणी यांच्या डाव्या पायाला व डोक्याला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेमध्ये घोष यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील नीना आणि यास्मिन पाठारे याही खाली पडून जखमी झाल्या होत्या. बबलू यांच्या मृत्यूप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. बाणी यांचा डावा पाय निकामी झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून तो काढावा लागला होता. यात त्या ८० टक्के अपंग झाल्या आहेत. या गंभीर प्रसंगातून सावरण्यास अवधी गेल्याने बबलू यांचा मुलगा अमित घोष यांनी याप्रकरणी १५ फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजे तब्बल दोन वर्षांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू