शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उल्हासनगरला होणार मुबलक पाणी पुरवठा, MIDC कडून 'एक्सप्रेस फिडर'ला NOC

By सदानंद नाईक | Updated: October 3, 2022 20:04 IST

वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील पाणी टंचाईला पूर्णविराम देण्यासाठी एमआयडिसीने एक्सप्रेस फिडरला एनओसी दिल्याने, वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, आयुक्त अजीज शेख यांच्या बैठकीनंतर अवघ्या तीन दिवसात निर्णय झाल्याची माहिती शिंदे गटाचे अरुण अशान यांनी दिली. उल्हासनगरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या आठवड्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला होता. शहरातील पाणीटंचाईला विराम देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तीन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त अजीज शेख, शिंदे गटाचे प्रमुख अरुण अशान, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वारंवार विधुत पुरवठा खंडित होत असल्याने, एक्सप्रेस फिडरची मागणी महापालिका कडून करण्यात आली. तसेच जुन्याच दरात मंजूर वाढीव ५० एमएलडी पाणी पुरावठ्याला मान्यता देण्यात आली. 

शहाड पाणी पुरवठा स्त्रोत महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास, शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याची मागणी शिंदे गटाचे अरुण अशान यांनी यावेळी केली. यासर्व मागणीला उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना त्वरित अभ्यास करून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. यावेळी शहराला उच्चदाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरची मागणी झाल्यावर, उधोगमंत्री सामंत यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. अवघ्या तीन दिवसात एक्सप्रेस फिडरला एमआयडीसी कडून मान्यता मिळाल्याने, वीज पुरवठा खंडित न होता, शहराला पाणी पुरवठा होणार असल्याने, पाणी टंचाई निकालात निघणार आहे.

वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानेच, पाणी पुरावठ्यावर परिणाम होऊन पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र एक्सप्रेस फिडरने वीज पुरवठा खंडित होणार नसल्याने, मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. १२० एमएलडी पाणी पुरावठ्या पेक्षा जास्त पाणी पुरावठ्याला ८ ऐवजी १२ रुपये दराने एमआयडीसी कडून बिल आकारले जात होते. आता जुन्याच ८ रुपये दराने बिल आकारण्यात येणार असून ५० एमएलडी वाढीव पाणी पुरावठ्याला मान्यता आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनीही एक्सप्रेस फिडरला मंजुरी मिळाल्याला दुजोरा दिला. 

चौकट शिंदे सरकारचा झटपट निर्णय शहरातील पाणी टंचाईवर अवघ्या तीन दिवसात तोडगा काढला आहे. यापुढे मुबलक पाणीपुरवठा होणार असून पाणी टंचाईला पूर्णविराम मिळाल्याचे अशान म्हणाले.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातthaneठाणेulhasnagarउल्हासनगर