शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरला होणार मुबलक पाणी पुरवठा, MIDC कडून 'एक्सप्रेस फिडर'ला NOC

By सदानंद नाईक | Updated: October 3, 2022 20:04 IST

वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील पाणी टंचाईला पूर्णविराम देण्यासाठी एमआयडिसीने एक्सप्रेस फिडरला एनओसी दिल्याने, वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, आयुक्त अजीज शेख यांच्या बैठकीनंतर अवघ्या तीन दिवसात निर्णय झाल्याची माहिती शिंदे गटाचे अरुण अशान यांनी दिली. उल्हासनगरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या आठवड्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला होता. शहरातील पाणीटंचाईला विराम देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तीन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त अजीज शेख, शिंदे गटाचे प्रमुख अरुण अशान, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वारंवार विधुत पुरवठा खंडित होत असल्याने, एक्सप्रेस फिडरची मागणी महापालिका कडून करण्यात आली. तसेच जुन्याच दरात मंजूर वाढीव ५० एमएलडी पाणी पुरावठ्याला मान्यता देण्यात आली. 

शहाड पाणी पुरवठा स्त्रोत महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास, शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याची मागणी शिंदे गटाचे अरुण अशान यांनी यावेळी केली. यासर्व मागणीला उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना त्वरित अभ्यास करून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. यावेळी शहराला उच्चदाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरची मागणी झाल्यावर, उधोगमंत्री सामंत यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. अवघ्या तीन दिवसात एक्सप्रेस फिडरला एमआयडीसी कडून मान्यता मिळाल्याने, वीज पुरवठा खंडित न होता, शहराला पाणी पुरवठा होणार असल्याने, पाणी टंचाई निकालात निघणार आहे.

वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानेच, पाणी पुरावठ्यावर परिणाम होऊन पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र एक्सप्रेस फिडरने वीज पुरवठा खंडित होणार नसल्याने, मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. १२० एमएलडी पाणी पुरावठ्या पेक्षा जास्त पाणी पुरावठ्याला ८ ऐवजी १२ रुपये दराने एमआयडीसी कडून बिल आकारले जात होते. आता जुन्याच ८ रुपये दराने बिल आकारण्यात येणार असून ५० एमएलडी वाढीव पाणी पुरावठ्याला मान्यता आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनीही एक्सप्रेस फिडरला मंजुरी मिळाल्याला दुजोरा दिला. 

चौकट शिंदे सरकारचा झटपट निर्णय शहरातील पाणी टंचाईवर अवघ्या तीन दिवसात तोडगा काढला आहे. यापुढे मुबलक पाणीपुरवठा होणार असून पाणी टंचाईला पूर्णविराम मिळाल्याचे अशान म्हणाले.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातthaneठाणेulhasnagarउल्हासनगर