शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरला होणार मुबलक पाणी पुरवठा, MIDC कडून 'एक्सप्रेस फिडर'ला NOC

By सदानंद नाईक | Updated: October 3, 2022 20:04 IST

वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील पाणी टंचाईला पूर्णविराम देण्यासाठी एमआयडिसीने एक्सप्रेस फिडरला एनओसी दिल्याने, वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, आयुक्त अजीज शेख यांच्या बैठकीनंतर अवघ्या तीन दिवसात निर्णय झाल्याची माहिती शिंदे गटाचे अरुण अशान यांनी दिली. उल्हासनगरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या आठवड्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला होता. शहरातील पाणीटंचाईला विराम देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तीन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त अजीज शेख, शिंदे गटाचे प्रमुख अरुण अशान, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वारंवार विधुत पुरवठा खंडित होत असल्याने, एक्सप्रेस फिडरची मागणी महापालिका कडून करण्यात आली. तसेच जुन्याच दरात मंजूर वाढीव ५० एमएलडी पाणी पुरावठ्याला मान्यता देण्यात आली. 

शहाड पाणी पुरवठा स्त्रोत महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास, शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याची मागणी शिंदे गटाचे अरुण अशान यांनी यावेळी केली. यासर्व मागणीला उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना त्वरित अभ्यास करून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. यावेळी शहराला उच्चदाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरची मागणी झाल्यावर, उधोगमंत्री सामंत यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. अवघ्या तीन दिवसात एक्सप्रेस फिडरला एमआयडीसी कडून मान्यता मिळाल्याने, वीज पुरवठा खंडित न होता, शहराला पाणी पुरवठा होणार असल्याने, पाणी टंचाई निकालात निघणार आहे.

वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानेच, पाणी पुरावठ्यावर परिणाम होऊन पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र एक्सप्रेस फिडरने वीज पुरवठा खंडित होणार नसल्याने, मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. १२० एमएलडी पाणी पुरावठ्या पेक्षा जास्त पाणी पुरावठ्याला ८ ऐवजी १२ रुपये दराने एमआयडीसी कडून बिल आकारले जात होते. आता जुन्याच ८ रुपये दराने बिल आकारण्यात येणार असून ५० एमएलडी वाढीव पाणी पुरावठ्याला मान्यता आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनीही एक्सप्रेस फिडरला मंजुरी मिळाल्याला दुजोरा दिला. 

चौकट शिंदे सरकारचा झटपट निर्णय शहरातील पाणी टंचाईवर अवघ्या तीन दिवसात तोडगा काढला आहे. यापुढे मुबलक पाणीपुरवठा होणार असून पाणी टंचाईला पूर्णविराम मिळाल्याचे अशान म्हणाले.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातthaneठाणेulhasnagarउल्हासनगर