शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उल्हास नदी झाली जलपर्णीमुक्त, पाणी झाले स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 00:51 IST

५० मजूर आणि जेसीबीच्या मदतीने उल्हास नदी जलपर्णी मुक्त केल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली.

उल्हासनगर : ५० मजूर आणि जेसीबीच्या मदतीने उल्हास नदी जलपर्णी मुक्त केल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली. जलपर्णी काढल्याने नदीचे पाणी स्वच्छ होऊन हजारो माशांना जीवदान मिळाले आहे.उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला उन्हाळ्यात जलपर्णीचा विळखा बसून हजारो मासे मृत्यूमुखी पडले. तसेच लाखो नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा झाला. सामाजिक संस्थेने याविरोधात आवाज उठवून जलपर्णी काढण्याचे काम संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केले. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेसह पाटबंधारे विभागाला जाग आली. पालिका पाणी पुरवठा विभागाने जेसीबी मशीन, डंपर आणि ५० मजुरांच्या सहाय्याने जलपर्णी काढून एका आठवड्यात नदीला जलपर्णीमुक्त केले. उन्हाळ्यापूर्वी नदी पात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याचे काम पाटबंधारे विभागासह संबंधित महापालिकांनी करायला हवे होते. मात्र तसे न झाल्याने नदीतील पाणी प्रदूषित झाले.शहरातील सेंच्युरी कंपनीजवळ उल्हास नदीत एमआयडीसीचे पंपिंग मशीन असून येथूनच लाखो नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पंपिंग स्टेशन येथील उल्हास नदीतील विहिरीला जलपर्णीने विळखा विळखा घातला होता. जलपर्णी, केरकचरा, प्लास्टिश पिशव्या या मशीनमध्ये अडकल्याने अनेकदा पंपिंग मशीन बंद करण्याची वेळ एमआयडीसीवर आली. त्यामुळे पुरवठा करण्यावर मर्यादा आली होती. जलपर्णी काढल्याने नदीचे पाणी स्वच्छ झाले. पाटबंधारे विभागासह उल्हासनगर महापालिकेने जलपर्णी काढण्याचे काम सुरू करून नदीला जलपर्णी मुक्त केल्याची माहिती कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली आहे.जलपर्णीला सामाजिक संस्थेचा हातभारउल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडून नदीचा श्वास कोंडून हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचा आरोप सामाजिक संस्थेने केला. तसेच महाराष्टÑ दिनी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी जलपर्णी काढण्यासाठी नदीत उतरले.

टॅग्स :riverनदीulhasnagarउल्हासनगर