शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

सरनाईक अन् भोईरांवर वरिष्ठांचा विश्वास, बंडखोरी करणार नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 16:03 IST

शिवसेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सरनाईकांच्या विरोधात असलेल्या काहींनी मुलाखती देऊन आव्हान निर्माण केले होते.

ठाणे  - युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरु झाले आहे. त्यानुसार ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण भागातील संभावीत बंडाळी थोपविण्यासाठी श्रेष्ठींनी अखेरच्या क्षणी प्रताप सरनाईक आणि सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे वरीष्ठांनी जरी हा तिडा सोडवला असला तरी स्थानिक पातळीवर अजूनही शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे नाराज आदेश पाळणार की बंड करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.  

शिवसेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सरनाईकांच्या विरोधात असलेल्या काहींनी मुलाखती देऊन आव्हान निर्माण केले होते. त्यामध्ये महापौर मीनाक्षी शिंदे, नरेश मणोरा आदींचा समावेश होता. शिवाय सरनाईक यांना उमेदवारी मिळू नये यासाठीदेखील मोठे लॉबींग सुरु होते. परंतु पक्षाने सलग तिसऱ्यांदा सरनाईक यांच्यावर विश्वास टाकला असून युती होण्यापूर्वीच एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे सरनाईकांच्या विरोधात असलेल्या त्यांच्याच पक्षातील मंडळींना वरीष्ठांनी हादरा दिला आहे. दरम्यान सरनाईक आता 1 ऑक्टोबरला आपला अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दुसरीकडे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्याविरोधातही काहींनी बंड थोपटले होते. त्यानुसार उमेदवारी आपल्यालाच मिळावी या दृष्टीने रमेश म्हात्रे, राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, ठाणो महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी आदींनी मुलाखती देऊन भोईरांपुढे कडवे आव्हान उभे केले होते. परंतु वरीष्ठांनी या नाराजांचे कडवे आव्हान ऐन उमेदवारी अर्ज भरण्याची आधीच थंड केले असून सुभाष भोईर यांच्यावरही सलग दुस:यांदा विश्वास टाकला असून पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. त्यानुसार येत्या 3 ऑक्टोबर रोजी भोईर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेच्या वरीष्ठांकडून पक्षातील संभावीत बंडाळी टाळण्यासाठीच हा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. परंतु स्थानिक पातळीवर नाराज झालेले हे बंडोबा आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असून बंड थोपटणार की पक्षाचा आदेश पाळला जाणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे