शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा - उद्धव ठाकरेंचा भाजपाला जबरदस्त टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 22:02 IST

निवडणुका घेऊच नका म्हणजे मोदीना विदेशवारी करण्यात अडचण येणार नाही

उल्हासनगर - देशात कर्नाटक  निवडणुकीच्या  निमित्ताने  जे  सुरु आहे ते पाहिल्यावर या देशात लोकशाही ची अवहेलना होते आहे ही असली लोकशाही काय कामाची असे म्हणत  राज्यपालप्रमाणे  मुख्यमंत्री ही नेमा आणि निवडणुकीत खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचवा, देशाला आणि राज्याला शिवशाहीची आवश्यकता आहे असा विश्वास व्यक्त करत या देशात लोकशाहीची अवहेलना होणार असेल तर ही लोकशाही काय कामाची निवडणुका घेऊच नका म्हणजे मोदीना विदेशवारी करण्यात अडचण येणार नाही, राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा असा जबरदस्त टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.

आज गुरुवारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त  उद्धव ठाकरे उल्हासनगर येथे आले होते. गोल मैदान पोलिस चौकीसमोरील मोहन लाइफ स्टाइल येथे खा. डॉ. शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून त्यानिमित्त उल्हासनगरात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही आयोजित करण्यात आली होती. 

आज खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम बघताना चार वर्षांपूर्वीचा तरुण मुलगा आठवतो. तो हाडाचा डॉक्टर असला तरी रक्ताचा शिवसैनिक आहे. एखादी जबाबदारी दिली की ती फत्ते होणार, याची खात्री असते. तसा विश्वास त्याने आपल्या कामातून निर्माण केलाय, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे काढले.महापालिका निवडणुकीनंतर ते प्रथमच उल्हासनगर येथे आले होते. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा चार वर्षांचा कार्यअहवाल आणि वेबसाईटचे उदघाटन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन होण्यापूर्वीच एवढी गर्दी होते याचा अर्थ खासदार म्हणून योग्य काम चालू आहे. हा जनतेचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असेल तर कोणालाही भिण्याची गरज नाही, असे कौतुगोदगार उद्धव ठाकरे यांनी काढले. माझ्या एका शब्दाखातर त्याने अंबरनाथच्या शिवमंदिराचा कायापालट करून दाखवला, तसेच उल्हासनगरमध्येही अद्ययावत रुग्णालय उभे करून दाखवणार म्हणजे दाखवणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विकास आराखडा कोणाचा, जनतेचा की फाईल चोरणाऱ्यांचा, असा बोचरा सवालही त्यांनी केला.

उल्हासनगरवासीयांनी शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले आहे. २०१४च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भरभरून मताधिक्य दिले. खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि आ. डॉ. बालाजी किणीकर सातत्याने उल्हासनगरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उल्हासनगरचा विकास आराखडा जनतेला उध्वस्त करणारा आहे, त्यामुळे शिवसेनेने त्याला कडाडून विरोध केला आहे आणि करत राहील, असे श्री. शिंदे म्हणाले. 

जनसंपर्क कार्यालयासाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. हे फक्त खासदार कार्यालय नसून सर्वसामान्य जनतेचे हक्काचे ठिकाण आहे, असे खा. डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. बाळासाहेबांच्या उल्हासनगरमध्ये अनेक सभा झाल्या होत्या. आजही इथल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्या सभांच्या आठवणी ताज्या आहेत. त्यामुळे उद्धव साहेबांच्या सभेविषयी उल्हासनगरवासियांच्या मनात उत्सुकता होती, असेही ते म्हणाले. उल्हासनगरशी संबंधित अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. इथल्या कामगार हॉस्पिटलचा पुनर्विकास शिवसेनेमुळेच मार्गी लागला आहे. रेल्वे स्थानकावरील सुविधा, व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रदूषणाचा प्रश्न अशा प्रत्येक बाबतीत शिवसेनेने प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणिकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख संध्या वढावकर, जिल्हा संघटक लता पाटील, विजया पोटे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे