शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू; तीन दिवसांत चौघांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 18:13 IST

काटईनाका ते कर्जत आणि कल्याण ते कर्जत हे दोन्ही राज्य महामार्ग धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ : काटईनाका ते कर्जत आणि कल्याण ते कर्जत हे दोन्ही राज्य महामार्ग धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांत चार तरुणांचा मृत्यू झाल्याने रस्ता आणि तेथील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.बदलापूर येथे राहणारे तरुण दिनेश मुकणे आणि आनंद शिंदे हे बदलापूरहून अंबरनाथला आपल्या दुचाकीवरून येत होते. त्याचवेळी अंबरनाथ दिशेकडे जाणा-या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या नादात या तरुणांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हे दोघे तरुण ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यातील दिनेश मुकणे याचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद शिंदे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातात चूक कोणाची आहे, याचे अद्याप पुरावे पुढे आलेले नाहीत. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताच्या दोन दिवस आधीच एमएमआरडीएच्या आनंदनगर एमआयडीसीसमोरील रस्त्यावर देखील दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातात मृत झालेल्या तरुणांची दुचाकी ही वेगात असली तरी ज्या ठिकाणी हा अपघात घडला ती जागा एमएमआरडीएच्या अधिका-यांमुळे अपघाताचे स्थान ठरले आहे. राज्य महामर्गावर अवघड वळण असू नये हे अपेक्षित असताना एमएमआरडीएने या ठिकाणी मोठे वळण ठेवले आहे. त्या वळणावर गाडी चालकांना पुढचा रस्ता दिसत नसल्याने त्यांची धडक ही थेट रस्त्याच्या दुभाजकाला होते. त्याच अपघातात या दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. या आधी देखील याच रस्त्यांवर अनेक दुचाकीस्वारांसोबत चारचाकी गाड्यांचेही अपघात घडले आहे.या ठिकाणी असलेले अवघड वळण काढण्याची गरज असताना देखील त्याचा कोणताच विचार एमएमआरडीए करीत नाही. तर सुरक्षेसाठी या ठिकाणी वेग कमी करण्याची कोणतीच यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. या रस्त्यासोबत फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर देखील सुरक्षेचे कोणतेच उपाय करण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रस्ता अरुंद करून ठेवला आहे. एवढेच नव्हे तर रस्त्याचे दुभाजक देखील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात