शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुचाकीच्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू; तीन दिवसांत चौघांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 18:13 IST

काटईनाका ते कर्जत आणि कल्याण ते कर्जत हे दोन्ही राज्य महामार्ग धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ : काटईनाका ते कर्जत आणि कल्याण ते कर्जत हे दोन्ही राज्य महामार्ग धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांत चार तरुणांचा मृत्यू झाल्याने रस्ता आणि तेथील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.बदलापूर येथे राहणारे तरुण दिनेश मुकणे आणि आनंद शिंदे हे बदलापूरहून अंबरनाथला आपल्या दुचाकीवरून येत होते. त्याचवेळी अंबरनाथ दिशेकडे जाणा-या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या नादात या तरुणांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हे दोघे तरुण ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यातील दिनेश मुकणे याचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद शिंदे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातात चूक कोणाची आहे, याचे अद्याप पुरावे पुढे आलेले नाहीत. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताच्या दोन दिवस आधीच एमएमआरडीएच्या आनंदनगर एमआयडीसीसमोरील रस्त्यावर देखील दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातात मृत झालेल्या तरुणांची दुचाकी ही वेगात असली तरी ज्या ठिकाणी हा अपघात घडला ती जागा एमएमआरडीएच्या अधिका-यांमुळे अपघाताचे स्थान ठरले आहे. राज्य महामर्गावर अवघड वळण असू नये हे अपेक्षित असताना एमएमआरडीएने या ठिकाणी मोठे वळण ठेवले आहे. त्या वळणावर गाडी चालकांना पुढचा रस्ता दिसत नसल्याने त्यांची धडक ही थेट रस्त्याच्या दुभाजकाला होते. त्याच अपघातात या दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. या आधी देखील याच रस्त्यांवर अनेक दुचाकीस्वारांसोबत चारचाकी गाड्यांचेही अपघात घडले आहे.या ठिकाणी असलेले अवघड वळण काढण्याची गरज असताना देखील त्याचा कोणताच विचार एमएमआरडीए करीत नाही. तर सुरक्षेसाठी या ठिकाणी वेग कमी करण्याची कोणतीच यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. या रस्त्यासोबत फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर देखील सुरक्षेचे कोणतेच उपाय करण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रस्ता अरुंद करून ठेवला आहे. एवढेच नव्हे तर रस्त्याचे दुभाजक देखील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात