शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

निवडणुकीसाठी केंद्रीय आयुक्तांकडून उद्यापासून कामकाजाची दोन दिवशीय झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:15 IST

* १९५० टोलफ्री क्रमांक- मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मतदारांना १९५० या टोलफ्री क्रमांकावर फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर घरात पाणी शिरल्यामुळे मतदान कार्ड हरवले असेल, वाहून गेलेले असल्यास त्या विषयीची माहिती देखील या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्दे ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार १९५० टोलफ्री क्रमांकसहा हजार ६२१ मतदान केंद्र

ठाणे : विधानसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी घोषीत होण्याची शक्यता आहे. यास अनुसरून ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कामकाजाची माहिती दिली. तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आरोरा व अशोक लवासा १७ सप्टेंबरपासून राज्याच्या दोन दिवशीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात निवडणुकीच्या कामकाजाचा वन टू वन आढावा घेणार असल्याचे ही त्यांनी यावेळी केले.           जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्यासाठी ५० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियोजनही केले आहे. याशिवाय पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या देखील निवडणूक आयुक्ता सुरक्षेच्या दृष्टीने दोन बैठका पार पडल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या विधानसभाच्या निवडणुकीसाठी सहा हजार ४८८ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. त्यावर ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ३४ लाख ४७ हजार १४८ पुरूषांसह २८ लाख ८२ हजार ४८८ महिला आणि ४६१ तृतीय पंथीयांना या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क दिलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये ५५ लाख ६२ हजार ९६५ मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्र आहे. तर ५४ लाख ८५ हजार ९३५ मतदारांचे मतदारयादीत छायाचित्र असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. येािील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.          लोकसभा निवडणुकीपेक्षा एक लाख पाच हजार ६१० मतदार या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी वाढले आहेत. तर मतदार यादीतून सहा हजार ४४४ मतदार वगळण्यात आलेले आहेत. यामध्ये तीन हजार ८६६ पुरूषांसह दोन हजार ५७८ महिला मतदार वगळण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाचा हक्क दिलेल्या ६३ लाख २९ हजार ३८५ मध्ये प्रथमच मतदान करणाऱ्यां ८१ हजार २५६ तरूण मतदारांचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिले. या मतदाराच्या मतदानासाठी ११ हजार ५९२ बॅलेट युनिट लागणार आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे १२ हजार २३४ बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. कंट्रोल युनीट आठ हजार २८० लागणार आहेत. पण आठ हजार ७३४ कंट्रोल युनीट तैनात केले आहे. याशिवाय आवश्यतेपेक्षा अधिक म्हणजे नऊ हजार ३८८ व्हीव्ही पॅड मशीन मतदानासाठी सज्ज केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.         या निवडणुकांसाठी शहरी व ग्रामीण भागात एक हजार ५०० मतदारांसाठी एक मतदान केंद्राचा निषक लावण्यात आलेला आहे. त्यानुसार सहा हजार ६२१ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. यामध्ये सहा हजार ४८८ मुळ मतदान केंद्र असून सहाय्यकारी १३३ मतदान केंद्रांचा समावेश आहे. यामधील पाच हजार ५०८ मतदान केंद्र तळमजल्यावर आहेत. तर मंडपात ८३२ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. लिफ्टची सुविधा असलेल्या पहिल्या मजल्यावर १९९ मतदान केंद्र आहेत. दुसऱ्यां मजल्यावर ५० आणि तिसऱ्यां मजल्यावर दोन मतदान केंद्र जिल्हा प्रशासनाने या विधारसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निश्चित केले आहेत.         या निवडणुकीसाठी तुर्भे येथील केंद्र शासनाने गोडाऊनमध्ये ईव्हीएम मशीन व निवडणुकीचे साहित्य ठेवले जाणार आहे. कोपरी येथील गोडाऊनमधील सर्व साहित्य तुर्भे येथील गोडाऊनमध्ये हलवण्यात येणार आहे. तुर्भे येथील गोडाऊन मोठे असल्यामुळे कंटेनर व इतर वाहने उभी करण्यासह वळवण्यासाठी मैदान आहे. या गोडाऊनमधूनच जिल्ह्यातील १८ विधानसभाच्या मतदान केंद्रांवर साहित्य पाठवण्याच नियोजन केले आहे. याशिवाय १८ स्ट्रॉग रूम्स व १८ मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणांची देखील पाहणी करून ते निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले...........

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी