शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

टीएमटीचे दोन मार्ग कायमचे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:46 AM

अत्यल्प उत्पन्नामुळे घेतला निर्णय : डोंबिवलीसह विटाव्याचा समावेश

ठाणे : आधीच डबघाईला आलेल्या परिवहन सेवेने आता अत्यल्प उत्पन्न देणारे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली पश्चिम आणि किसनगर ते विटावा हे दोन महत्त्वाचे मार्ग बंद करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. हे दोन्ही मार्ग प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्याचा दावा परिवहनने केला असून दोन वर्षानंतर त्यांना हे शहाणपण सुचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १६ जूनपासून हे दोन्ही मार्ग बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी जास्तीचे उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसेस वळत्या केल्या जाणार आहेत.

परिवहनचे रोजचे उत्पन्न हे २८ ते २९ लाखांच्या घरात आहे. परिवहनचे १०४ मार्ग आहेत. त्यातील उत्पन्न देणारे आणि कमी उत्पन्न देणारे मार्ग कोणते, यावर आजही सर्व्हे सुरू आहे. परिवहनची ही परिस्थिती असताना तब्बल दोन वर्षानंतर प्रशासनाला जागा आली असून त्यांनी अत्यल्प उत्पन्न देत असलेल्या चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली (पश्चिम) आणि किसनगर ते विटावा हे दोन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील किसनगर ते विटावा हा मार्ग जानेवारी २०१७ मध्ये आणि चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली हा मार्ग मार्च २०१७ मध्ये सुरू केला होता. सुरुवातीला या बसला प्रवाशीच मिळत नव्हते. कालांतराने प्रवाशांची संख्या वाढेल अशी आशा होती. परंतु, त्यांची ती फोल ठरली. डोंबिवलीला जाण्यासाठी परिवहनच्या सात बसेस ठेवण्यात आल्या होत्या. या बसच्या दिवसभरात २८ फेºया होत होत्या. परंतु, २८ फेऱ्यांमधून केवळ ६० ते ७० प्रवाशीच प्रवास करीत असल्याची माहिती आता समोर आली आहे. तर किसनगर ते विटावा या मार्गावर ४ बसच्या दिवसाला ८ फेºया होत होत्या. या बसेसमधूनही रोज केवळ ५० ते ६० प्रवाशीच प्रवास करीत होते. यामुळे हा मार्ग तोट्यात असल्याचे शहाणपण परिवहन प्रशासनाला सुचले आणि हे दोन्ही मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीला ट्रेनचा प्रवास सोयीचा आहे. रेल्वेचे तिकीट कमी आणि वाहतूककोंडी नाही. या कारणांमुळेच प्रवाशांनी परिवहनकडे पाठ फिरवली. किसनगर ते विटावा हासुद्धा लांबचा पल्ला असल्याने वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळेच हा मार्गही बंद करावा लागत आहे.आनंदनगर ते ठाणे स्टेशन धावणार बसचेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली आणि किसनगर ते विटावा हे दोन्ही मार्ग बंद केल्यानंतर त्या मार्गावरील बस आता घोडबंदर मार्गावर धावणार आहेत. आनंद नगर ते ठाणे स्टेशन (पश्चिम) असा या बसेसचा मार्ग असणार आहे.अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने आणि प्रवाशांची संख्यासुद्धा कमी असल्याने हे दोन्ही मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या मार्गावरील बस जास्तीचे उत्पन्न आणि प्रवासी देणाºया मार्गावर धावणार आहेत.- संदीप माळवी, व्यवस्थापक,परिवहन सेवा, ठाणे

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका