शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

मीरा भाईंदर मधील दोघा अट्टल गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी केले तडीपार   

By धीरज परब | Updated: July 12, 2024 19:21 IST

Mira Road News: मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी भाईंदरच्या दोघा अट्टल गुन्हेगारांना २ वर्षां करिता ४ जिल्ह्यातून तडीपार केले आहे . 

मीरारोड - मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी भाईंदरच्या दोघा अट्टल गुन्हेगारांना २ वर्षां करिता ४ जिल्ह्यातून तडीपार केले आहे . 

भाईंदर पूर्वेला लारा पालनाथ नाडार ( ३८ ) यांच्यावर २०१२ ते २०१४ या कालावधीत उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत गंभीर दुखापत, गर्दी करुन मारामारी करणे, दुखापत करुन जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत .  २०१४ मध्ये ठाणे उपविभागीय दंडाधिकारी यांनी लारा ह्याला ६ महिन्यासाठी तडीपार केले होते. तडीपार करुनही लारा ह्याने नवघर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्हे करत दहशत माजवली .  नवघर पोलीस ठाण्यात त्याच्यावरखंडणी मागणे, महिला अत्याचार, अपंग व्यक्तीशी गैरवर्तन, फसवणूक आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले.  लारा वर १० गुन्हे दाखल आहेत .  पोलिसांनी लारा ह्याला ठाणे , पालघर , मुंबई , मुंबई उपनगर अश्या ४ जिल्ह्यातून तडीपार केले आहे . 

उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार गणेश मोहन शेट्टी (२५ ) ह्याला देखील दोन वर्षांसाठी ५ जिल्ह्यातून तडीपार केले गेले आहे . शेट्टी याच्यावर २०१७ ते २०२३ याकालावधीत उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत गंभीर दुखापत, मारामारी करणे, चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत . त्याच्यावर २०२३ मध्ये चॅप्टर केस करून देखील त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा झाली नाही . त्याच्यावर ८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला देखील  ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यातून तडीपार केले आहे अशी माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर