शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

संपाचा दोन लाख कुटुंबांना फटका; रेशनकार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची यंत्रे जमा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:55 IST

रेशन मिळणे बंद झाल्याचा रोष रेशन दुकानदारांवर निघू लागल्याने या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे.

ठाणे : शिधापत्रिका आधारकार्डांशी संलग्न करण्याच्या सरकारच्या निर्णयाची पूर्णत: अंमलबजावणी झालेली नसल्याने अनेकांना रेशन मिळणे बंद झाल्याचा रोष रेशन दुकानदारांवर निघू लागल्याने या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे.ठाणे, कळवा-मुंब्रा, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीमधील सुमारे दीड हजार दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याचा फटका एक लाख ९१ हजार शिधापत्रिकाधारकांना बसला आहे. यामध्ये केशरी कार्डधारकांची संख्या लक्षणीय म्हणजे ८० हजारांच्या घरात आहे.दुकाने बेमुदत बंद करण्याचा व गुरुवारी दुपारी १२ वाजता मुख्य रेशनिंग कार्यालयात रेशनकार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याचे यंत्र जमा करण्याचा निर्णय रेशनिंग दुकानदारांनी घेतला आहे.शिधावाटपाची प्रक्रि या बायोमेट्रीक करण्यात आली. नागरिकांची शिधापत्रिका ही आधारकार्डांशी संलग्न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रेशनव्यवस्थेमधील भ्रष्टाचार दूर करण्याकरिता सरकारने हे निर्णय घेतले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी वृद्ध नागरिक कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या अंगठ्यांचे ठसे या बायोमेट्रीक प्रणालीमध्ये वार्धक्यामुळे जुळत नसल्याने गोरगरिबांना धान्य देण्यात अडचणी येत आहेत. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांकडून कागदपत्रे घेऊन ती शासनदरबारी जमा केल्यानंतरही चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.चुकीचा डाटा जमा केल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच, या बायोमेट्रीक पद्धतीमुळे कुटुंबातील अनेक सदस्यांना धान्य घेण्यासाठी दुकानात जावे लागत आहे. गेली पाच वर्षे आधार संलग्नतेची प्रक्रि या सुुरू असूनही त्यामध्ये सुधारणा न झाल्यानेच हा बंद पुकारण्यात आला असल्याचे ठाणे जिल्हा रेशनिंग दुकानदार कृती समितीने सांगितले.या बंदमध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर आदी भागांतील सुमारे १४७३ दुकानदार सहभागी झाले आहेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रक्रि या सुधारण्यासाठी दोन बैठका घेण्यात आल्या. मात्र, तोडगा न निघाल्याने आंदोलन केल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.दरम्यान, बुधवारी राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील तसेच रेशनिंग दुकानदार उपस्थित होते. या बैठकीत शासनाला जाग येण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता रेशनकार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याच्या मशीन मुख्य रेशनिंग कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत या मशीनमधील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत बंद कायम राहील, असा इशारा दिला जाईल.बंदच्या काळात धान्य नाहीया बंदचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसणारअसून जवळपास एक लाख ९१ हजार कुटुंबांनाबंदच्या काळात धान्य मिळणार नाही. ठाणे जिल्ह्यातील पिवळ्या रेशनकार्डधारक बीपीएल आणि अंत्योदय अशा दोन योजनांच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे.बीपीएलअंतर्गत ५६ हजार ४९३, तर अंत्योदय योजनेंतर्गत ४७ हजार ५१ रेशनकार्डधारक येतात. केशरी रेशनकार्ड असलेले ८० हजार ४९०, तर शुभ्र रेशनकार्ड असलेले सात हजार ८२ रेशनकार्डधारक आहेत.मेस्मा, मकोका लावण्याच्या धमक्यारेशनिंग दुकानदारांचा बंद मोडीत काढण्यासाठी समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर ‘मेस्मां’तर्गत कारवाई करण्याच्या तसेच ‘मकोका’ लावण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याकडे समितीने लक्ष वेधले.कळव्यात दोन दुकाने फोडलीरेशनिंगवर धान्य मिळत नसल्याने आणि आधारकार्ड रेशनिंग कार्डशी लिंक करण्याची मागणी होत असल्याने ते जुळले जात नसल्याने अनेकांना धान्य मिळेनासे झाले आहे. याच रोषातून मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी कळव्यातील दोन दुकाने फोडण्यात आली. एका ठिकाणी तर आधारकार्ड लिंकच्या मशीनची नासधूस करण्यात आली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड