शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ठाणे-पालघरमध्ये दोन लाख बोगस विद्यार्थी? मुख्याध्यापक, संचालक रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:04 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पाच नगरपालिका, सात महापालिका आणि १८ तालुक्यांतील ७५ प्राथमिक शाळांचा पटसंख्या खोटी दाखवून शासन सवलती मिळवण्यात समावेश असून माध्यमिक शाळांचा विचार करता कारवाईस पात्र शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पाच नगरपालिका, सात महापालिका आणि १८ तालुक्यांतील ७५ प्राथमिक शाळांचा पटसंख्या खोटी दाखवून शासन सवलती मिळवण्यात समावेश असून माध्यमिक शाळांचा विचार करता कारवाईस पात्र शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांत माध्यमिक व प्राथमिक मिळून दोन लाख विद्यार्थ्यांची पटसंख्या बोगस असल्याचा अंदाज आहे.पटसंख्या फुगवून सवलती मिळवलेल्या व मिळवण्याच्या तयारीतील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शाळेचे मुख्याध्यापक, संचालक आणि शिक्षकांवर फौजदारी कारवाईसाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जोरदार तयारी सुरू केली असल्याचे वृत्त लोकमतने यापूर्वीच प्रसिद्ध केले आहे. आता पुन्हा शाळांची तपासणी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.लोकमतच्या वृत्तानंतर शिक्षण विभागाने आता कंबर कसून युद्धपातळीवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित शाळांच्या संचालकांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य संबंधित कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता शासनाचे पत्र आले आहे. त्यावर कारवाई करण्यापूर्वी आधीच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून संबंधित शाळांवर कारवाईचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना देणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक मुक्तेश्वर छडीदार यांनी लोकमतला सांगितले.कारवाईसाठी चार निकषया कारवाईसाठी शासनाने सुमारे चार निकष दिले आहेत. त्यात मोडणाºया शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना तसे आदेश दिले जातील. शाळेत जाऊन तत्कालीन दस्तऐवज व दिलेल्या निकषांची तपासणी होऊन कारवाई होईल.प्राथमिक शाळेच्या सुमारे ७५ शाळांचा खोटी पटसंख्या नोंदवलेल्यांमध्ये समावेश आहे. यातील सुमारे ४५ शाळांना काही वर्षांपूर्वी नोटीसही बजावलेली आहेत. मात्र, पुन्हा फौजदारी कारवाईसाठी या शाळांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश असल्याचे छडीदार यांनी सांगितले. यातील बहुतांश मुख्याध्यापकांचे निधन झाले असावे ,अशी शंका शैक्षणिक वर्तुळात व्यक्त होत आहे. यावरून खोटी विद्यार्थी पटसंख्या नोंदणाºयांवर आता काय कारवाई होईल, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे.२० लाख विद्यार्थ्यांची केली होती तपासणीसात वर्षांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात एक हजार ५५५ अधिकाºयांच्या ३० पथकांनी शाळांची विद्यार्थी पटपडताळणी केली आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांमधील सुमारे २० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांची पटसंख्येची पडताळणी झाली आहे. यामध्ये प्राथमिक शाळा पाच हजार ७१८ शाळा आहेत. यातील तीन हजार ५७९ शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत.उर्वरित एक हजार ५८२ शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि आश्रमशाळा आहेत. या शाळांमधील ५७६ शाळा अनुदानित आहेत. उर्वरित शाळा विनाअनुदानित व कायम विनानुदानित आहेत. या सर्व शाळांमधील २० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांची पटसंख्या पडताळण्यात आली.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी