शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली अखेर सापडल्या; पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ 

By जितेंद्र कालेकर | Updated: September 26, 2022 18:57 IST

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली सापडल्या आहेत. 

ठाणे: सोमवारी सकाळी ठाण्यातील एका शाळेतील नववीतील दोन विद्यार्थीनी शाळेत जाण्याऐवजी मुलूंडच्या उद्यानामध्ये गेल्यामुळे शिक्षकांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा सुटण्याच्या वेळेत फेरफटका मारुन या मुली पुन्हा शाळेतच परतल्यामुळे पालकांसह श्रीनगर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. ठाण्यातील वागळे इस्टेट शिवाजीनगर भागातील संकल्प स्कूलमधील इयत्ता नववीतील दोन १४ वर्षीय विद्यार्थीनी शाळेबाहेरुनच बेपत्ता झाल्याची माहिती याच शाळेच्या एका विद्यार्थीनीने शिक्षकांना दिली. 

घटनेची माहिती मिळताच या मुलींची त्यांच्या घरीही सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून शोधाशोध सुरु झाली. त्या घरी देखील नसल्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्याकडून याबाबत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. तोपर्यंत एका मुलीकडून माहिती मिळाली की, रविवारीच तीन मुलींनी मुलूंडच्या उद्यानात फिरायला जाण्याची योजना बनविली होती. तिसऱ्या मुलीला तिची आई शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडण्यासाठी गेल्यामुळे ती या दोन मुलींसोबत जाऊ शकली नव्हती. 

पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ सोशल मिडियावरुन या दोन मुली बेपत्ता झाल्याची वार्ता शहरभर पसरली. तोपर्यंत ठरलेल्या योजनेनुसार शाळा सुटण्याच्या वेळेत कथित बेपत्ता झालेल्या मुली पुन्हा शाळेकडे परतल्या. तोपर्यंत श्रीनगर पोलिसांकडून या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हाही दाखल झाला नव्हता. परंतु, आपल्या मुली सुखरुप घरी परतल्याचे पाहून पालक आणि शिक्षकांनीही सुटकेचा श्वास घेतला. 

पालकांनी आपल्या मुलांशी मैत्री करीत त्यांच्याशी संवाद वाढविला पाहिजे. अनेकवेळा आई आणि वडिलही नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुले एकाकी पडतात. त्यांनाही बाहेर फिरावेसे वाटते. त्यामुळे कधीतरी त्यांनाही फिरायला न्यावे. परंतू, मुले आणि मुलींनीही पालक आणि शिक्षकांच्या परवानगी विना घर आणि शाळा सोडणेही चुकीचे आहे. त्यामुळे एखादी दुर्घटनाही घडण्याची शक्यता असते. असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी म्हटले. 

 

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाPoliceपोलिस