शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली अखेर सापडल्या; पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ 

By जितेंद्र कालेकर | Updated: September 26, 2022 18:57 IST

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली सापडल्या आहेत. 

ठाणे: सोमवारी सकाळी ठाण्यातील एका शाळेतील नववीतील दोन विद्यार्थीनी शाळेत जाण्याऐवजी मुलूंडच्या उद्यानामध्ये गेल्यामुळे शिक्षकांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा सुटण्याच्या वेळेत फेरफटका मारुन या मुली पुन्हा शाळेतच परतल्यामुळे पालकांसह श्रीनगर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. ठाण्यातील वागळे इस्टेट शिवाजीनगर भागातील संकल्प स्कूलमधील इयत्ता नववीतील दोन १४ वर्षीय विद्यार्थीनी शाळेबाहेरुनच बेपत्ता झाल्याची माहिती याच शाळेच्या एका विद्यार्थीनीने शिक्षकांना दिली. 

घटनेची माहिती मिळताच या मुलींची त्यांच्या घरीही सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून शोधाशोध सुरु झाली. त्या घरी देखील नसल्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्याकडून याबाबत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. तोपर्यंत एका मुलीकडून माहिती मिळाली की, रविवारीच तीन मुलींनी मुलूंडच्या उद्यानात फिरायला जाण्याची योजना बनविली होती. तिसऱ्या मुलीला तिची आई शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडण्यासाठी गेल्यामुळे ती या दोन मुलींसोबत जाऊ शकली नव्हती. 

पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ सोशल मिडियावरुन या दोन मुली बेपत्ता झाल्याची वार्ता शहरभर पसरली. तोपर्यंत ठरलेल्या योजनेनुसार शाळा सुटण्याच्या वेळेत कथित बेपत्ता झालेल्या मुली पुन्हा शाळेकडे परतल्या. तोपर्यंत श्रीनगर पोलिसांकडून या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हाही दाखल झाला नव्हता. परंतु, आपल्या मुली सुखरुप घरी परतल्याचे पाहून पालक आणि शिक्षकांनीही सुटकेचा श्वास घेतला. 

पालकांनी आपल्या मुलांशी मैत्री करीत त्यांच्याशी संवाद वाढविला पाहिजे. अनेकवेळा आई आणि वडिलही नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुले एकाकी पडतात. त्यांनाही बाहेर फिरावेसे वाटते. त्यामुळे कधीतरी त्यांनाही फिरायला न्यावे. परंतू, मुले आणि मुलींनीही पालक आणि शिक्षकांच्या परवानगी विना घर आणि शाळा सोडणेही चुकीचे आहे. त्यामुळे एखादी दुर्घटनाही घडण्याची शक्यता असते. असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी म्हटले. 

 

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाPoliceपोलिस