शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन दिवसांनी पाडणार पत्रीपूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:06 IST

वाहतुकीसाठी अतिधोकादायक असलेला कल्याणचा जुना पत्री पूल पाडण्याची कारवाई दोन दिवसांनी सुरु केली जाणार आहे

कल्याण : वाहतुकीसाठी अतिधोकादायक असलेला कल्याणचा जुना पत्री पूल पाडण्याची कारवाई दोन दिवसांनी सुरु केली जाणार आहे. याठिकाणी नव्या पुलाचे बांधकाम सुरु होणार असून, त्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.जुन्या पत्री पुलासंदर्भात मंगळवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीस राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राम जैस्वार यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त, रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. जुना पत्री पूल वाहतुकीसाठी तीन दिवसांकरीता बंद राहिल. पुलावरील महापालिकेचे पथदिवे, वीजवितरण कंपनीच्या केबल्स आणि अन्य सेवावाहिन्या काढून घेण्याची कारवाई तीन दिवसांमध्ये केली जाईल. पूल पाडण्याचे काम तीन दिवसांनी हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेला नवा पूल आणि जुना पूल या दोहोंमध्ये नवा पूल प्रस्तावित आहे. रेल्वेकडून मंजुरी आल्यानंतर पूल पाडल्यापासून पंधरा दिवसाच्या आत नव्या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. नव्या पुलाचे काम तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या कामासाठी खर्चाच्या तरतुदीची समस्या नाही. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आलेली आहे. याच खर्चातून नवा पूल उभारणे प्रस्तावित आहे. हे काम तातडीने पूर्ण केले जाईल. जुना पत्री पूल पाडल्यानंतर दरम्यानच्या काळात या पुलावरील हालक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार का, असा सवाल पोलिस यंत्रणेकडे उपस्थित केला असता, पर्यायी मार्गच नसल्याने आहे नव्या पूलावरुनच वाहतूक सुरु राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पत्री पूल होणार इतिहासजमा : जुना पत्री पूल १९१४ साली ब्रिटिशांनी उभारला होता. १०४ वर्षे जुना हा पूल म्हणजे शहराची ओळख आहे. काळाच्या ओघात नागरीकरण वाढले. लोकसंख्या वाढली. सोबतच वाहनांची संख्याही वाढली. त्याचा ताण पत्री पुलावर आला. त्यामुळे पूल धोकादायक झाला. मात्र १०४ वर्षे तग धरून असलेला हा पूल ब्रिटिशांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या पत्री पुलाची योग्य देखभाल ठेवण्यात आली नाही. त्यामुळे हा पूल तोडण्याची वेळ आली.

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वेroad transportरस्ते वाहतूक