शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

आदिवासींचे उभे पीक जेसीबीद्वारे केले नष्ट, १६० गुंठे क्षेत्रावरील पिकाचे नुकसान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 02:13 IST

येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे.

ठाणे : कल्याण तालुक्यातील कांबा गावाजवळील वाघेरेपाडा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांवर व कापणीच्या गवतावर रविवारी रात्री ट्रॅक्टर व जेसीबी फिरवून ते नष्ट केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडा टिटवाळा पोलीस ठाण्यात सोमवारी केली.येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे. सुरेश हिंदोळे यांच्या १२० गुंठे शेतीवरील पिकासह काथोड पुजारी यांचे व सावळाराम पुजारी या दोघा शेतकऱ्यांचे प्रत्येक २० गुंठे शेतातील पिकांचे प्रत्येकी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या शेतजमिनीवर अतिक्रमण करण्याच्या हेतूने दसऱ्याच्या दिवशी हे कृत्य करणाऱ्यांच्या नावाचा उल्लेखही या शेतकऱ्यांनी तक्रारीत केला आहे.आदिवासींच्या या शेतजमिनीच्या वादासंबंधी याआधीही कल्याण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसीटीचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यास न जुमानता पीक नष्ट करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, एफआयआर नोंदवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावले आहे, पण ते येत नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती