शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वनहक्कासाठी जिल्ह्यातील आदिवासीं धडकले कोकण भवनला; चर्चेसाठी प्रशासन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 16:46 IST

शेत जमीन म्हणून कसत असलेले वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कल्याण येथे एकत्र येऊन नवी मुंबईच्या कोकणभवनकडे आगेकूच केली. यादरम्यान पालघर व रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कोकणभवन येथील विभागीय आयुक्तालयाजवळ एक आले आणि त्यांनी जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून प्रशासनास गुरूवारी चांगलेच धारेवर धरले.वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही.संघटनेच्या शिष्टमंडळास सोमवारी ११ मार्च रोजी प्रलंबित मागण्यांसाठी बैठकीची लेखी हमी

ठाणे : वनहक्काचे दावे त्वरीत निकाली काढण्यासह वनहक्क कायद्याची प्रभावी व चोख अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ठाणेसह पालघर, रायगड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी स्त्री - पुरूषांनी कोकण भवन येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून प्रशासनास गुरूवारी चांगलेच धारेवर धरले. या मोर्चाची त्वरीत दखल घेऊन संघटनेच्या शिष्टमंडळास सोमवारी ११ मार्च रोजी प्रलंबित मागण्यांसाठी बैठकीची लेखी हमी उपायुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी दिली.शेत जमीन म्हणून कसत असलेले वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कल्याण येथे एकत्र येऊन नवी मुंबईच्या कोकणभवनकडे आगेकूच केली. यादरम्यान पालघर व रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कोकणभवन येथील विभागीय आयुक्तालयाजवळ एक आले आणि त्यांनी जोरदार धडक दिली. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी आयुक्तालयाचा परिसर दणाणून सोडला. या मोर्चेकरांची वेळीच दखल घेत उपायुक्तांनी वननिवासी , वनहक्काच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोकणभवनला बैठकीचे नियोजन केल्याचे मोर्चेकराना लेखी आश्वासन दिले.श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढल्याचे अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी लोकमतला सांगितले. प्रदीर्घ काळापासून वनपट्टे कसणारे आदिवासी आजून ही त्यांच्या वनपट्टेच्या हक्कापासून वंचित आहेत. यामुळे संतापलेले आदिवासी एकत्र येऊन आयुक्तालयावर धडक देत प्रशासनास त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी आदी ठिकाणी मागील काही वर्षांपासून फेºया मारणाºया या बहुतांशी आदिवासींचे वनपट्टे अद्यापही नावे झालेले नाही. बहुतांशीं आदिवासींचे वनहक्काचे प्रस्ताव हरवल्याचे सांगितले जात असल्यामुळे संतापलेल्या आदिवासींनी विभागीय आयुक्तलय आज धारेवर धरले.बहुतांशी आदिवासींचे वनपट्टे नावे करण्याचे प्रस्ताव प्रदीर्घकाळापासून प्रलंबित ठेवले आहेत. या प्रस्तावाना त्वरीत निकाली काढण्यासाठी वनहक्क कायद्याची प्रभावी व त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. बेकायदेशीरपणे अमान्य केलेले वनहक्क दाव्यांची त्वरीत फेरचौकशी करावी, त्यावर वेळीच निर्णय घ्यावा. दावा केलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या निर्णयाविरूध्दचे अपील निकाली काढा, आदिवासी वाडी, पाड्यांचे वहिवाटीच्या जंगलावरील सामुहीक वनहक्क मान्य करा, या वनहक्क धारकाना विविध योजनांचा लाभ त्वरीत मिळावा. मान्य केलेल्या वनहक्काच्या दाव्यांचे सातबारा उतारे व नकाशे त्वरीत द्यावे आदी मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता............ुफोटो - ०७ठाणे आदिवासी मोर्चा

टॅग्स :thaneठाणेforestजंगलFarmerशेतकरी