शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

वनहक्कासाठी जिल्ह्यातील आदिवासीं धडकले कोकण भवनला; चर्चेसाठी प्रशासन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 16:46 IST

शेत जमीन म्हणून कसत असलेले वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कल्याण येथे एकत्र येऊन नवी मुंबईच्या कोकणभवनकडे आगेकूच केली. यादरम्यान पालघर व रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कोकणभवन येथील विभागीय आयुक्तालयाजवळ एक आले आणि त्यांनी जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून प्रशासनास गुरूवारी चांगलेच धारेवर धरले.वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही.संघटनेच्या शिष्टमंडळास सोमवारी ११ मार्च रोजी प्रलंबित मागण्यांसाठी बैठकीची लेखी हमी

ठाणे : वनहक्काचे दावे त्वरीत निकाली काढण्यासह वनहक्क कायद्याची प्रभावी व चोख अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ठाणेसह पालघर, रायगड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी स्त्री - पुरूषांनी कोकण भवन येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून प्रशासनास गुरूवारी चांगलेच धारेवर धरले. या मोर्चाची त्वरीत दखल घेऊन संघटनेच्या शिष्टमंडळास सोमवारी ११ मार्च रोजी प्रलंबित मागण्यांसाठी बैठकीची लेखी हमी उपायुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी दिली.शेत जमीन म्हणून कसत असलेले वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कल्याण येथे एकत्र येऊन नवी मुंबईच्या कोकणभवनकडे आगेकूच केली. यादरम्यान पालघर व रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कोकणभवन येथील विभागीय आयुक्तालयाजवळ एक आले आणि त्यांनी जोरदार धडक दिली. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी आयुक्तालयाचा परिसर दणाणून सोडला. या मोर्चेकरांची वेळीच दखल घेत उपायुक्तांनी वननिवासी , वनहक्काच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोकणभवनला बैठकीचे नियोजन केल्याचे मोर्चेकराना लेखी आश्वासन दिले.श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढल्याचे अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी लोकमतला सांगितले. प्रदीर्घ काळापासून वनपट्टे कसणारे आदिवासी आजून ही त्यांच्या वनपट्टेच्या हक्कापासून वंचित आहेत. यामुळे संतापलेले आदिवासी एकत्र येऊन आयुक्तालयावर धडक देत प्रशासनास त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी आदी ठिकाणी मागील काही वर्षांपासून फेºया मारणाºया या बहुतांशी आदिवासींचे वनपट्टे अद्यापही नावे झालेले नाही. बहुतांशीं आदिवासींचे वनहक्काचे प्रस्ताव हरवल्याचे सांगितले जात असल्यामुळे संतापलेल्या आदिवासींनी विभागीय आयुक्तलय आज धारेवर धरले.बहुतांशी आदिवासींचे वनपट्टे नावे करण्याचे प्रस्ताव प्रदीर्घकाळापासून प्रलंबित ठेवले आहेत. या प्रस्तावाना त्वरीत निकाली काढण्यासाठी वनहक्क कायद्याची प्रभावी व त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. बेकायदेशीरपणे अमान्य केलेले वनहक्क दाव्यांची त्वरीत फेरचौकशी करावी, त्यावर वेळीच निर्णय घ्यावा. दावा केलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या निर्णयाविरूध्दचे अपील निकाली काढा, आदिवासी वाडी, पाड्यांचे वहिवाटीच्या जंगलावरील सामुहीक वनहक्क मान्य करा, या वनहक्क धारकाना विविध योजनांचा लाभ त्वरीत मिळावा. मान्य केलेल्या वनहक्काच्या दाव्यांचे सातबारा उतारे व नकाशे त्वरीत द्यावे आदी मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता............ुफोटो - ०७ठाणे आदिवासी मोर्चा

टॅग्स :thaneठाणेforestजंगलFarmerशेतकरी