शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आचारसंहिता लागण्यापूर्वी ठामपा आयुक्त संजीव जैस्वाल यांची बदली करा, निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 19:39 IST

सरकारी मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका पदावर कोणताही आय ए एस अधिकारी असू नये

ठाणे : सरकारी मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका पदावर कोणताही आय ए एस अधिकारी असू नये, अन्यथा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचे स्थानिक हितसंबंध तयार होतात, विशेषतः निवडणुकांच्या वेळी या हितसंबंधांचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणुकीच्या आधी अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून दिले जातात, लोकशाही तत्वप्रमाणे ही एक योग्य परंपरा  प्रत्येक निवडणुकीत पाळली जाते. 

ठाणे महापालिकेत मात्र संजीव जैस्वाल हे साडे चार वर्षे त्यांच्या हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, महापौर व अनेक नगरसेवक याबाबतीत वारंवार निषेध करीत आहेत, असे असतानाही, खूप तक्रारी असूनही, केवळ पालक मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांची बदली केली जात नाही आणि आता राज्यात सार्वत्रिक निवडणूक येऊ घातलेल्या असताना त्यांची बदली करणे हे अत्यावश्यक बनले आहे, असे निदर्शनास आणून आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची बदली करावी अशी मागणी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून करण्यात आली आहे, कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे यांनी असे पत्र लिहिले आहे.

सरकारी मार्गदर्शक तत्वे व नियमाला अनुसरून तशी बदली करणे आवश्यक बाब आहे, अशी बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला द्यावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली असून या पत्राची प्रत राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील पाठविण्यात  आली आहे. 

अशा प्रकारे बदली न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका सादर करून हा प्रश्न धसास लावण्यात येईल, असे स्पष्ट प्रतिपादन उन्मेष बागवे यांनी केले असून वेळ पडल्यास शिवसेना-भाजप वगळून अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणूक अधिसूचना लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता असताना घटनात्मक पेचप्रसंग उभा राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका