शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

डॉ. आंबेडकर वसतिगृहातील गृहपालांची बदली , विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:02 AM

भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती.

- नितीन पंडितभिवंडी : भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती. विद्यार्थ्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्वांची दखल घेत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे यांनी गोन्नाडे यांची बदली केली आहे.आलेल्या तक्रारींनंतर जिल्हा समाजकल्याण विभागाने गोन्नाडे यांना चांगलेच धारेवर धरले होते. अखेर गोन्नाडे यांच्याकडे अतिरिक्त असलेला भिवंडीतील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील अतिरिक्त गृहपालपदाचा पदभार बुधवारी काढून घेतला. त्यांच्याऐवजी कल्याण येथील मागासवर्गीय मुलांच्या ( गुणवंत ) वसतिगृहाचे गृहपाल एस. एन. सातरले यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला आहे.वसतिगृहात आठवी ते एमएस्सी तसेच एलएलबीचे शिक्षण घेणारे ३५ विद्यार्थी राहत असून वसतिगृहत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने अनेक विद्यार्थी हे वसतिगृह सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे सध्या या वसतिगृहात १५ ते १७ विद्यार्थी राहत आहेत . विशेष म्हणजे या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी हे नांदेड, लातूर , सोलापूर, जळगाव, पुणे, जुन्नर ,चंद्रपूर, भुसावळ, चाळीसगाव अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आली आहेत. कमी विद्यार्थी असूनही या विद्यार्थ्यांना गृहपालांकडून सडलेली फळे, जास्त पाणी टाकलेले दूध, निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी केला आहे. या संदर्भात गोन्नाडे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी वारंवार तक्र ारी केल्या होत्या.नियमांप्रमाणे मिळणार सुविधायापुढे सरकारी नियमांप्रमाणेच आम्हाला जेवण व इतर सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन आम्हाला समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रि या विद्यार्थी इम्रान रेहमान मोमीन याने दिली आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे