शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

रेल्वेचे बुकिंग करा रद्द; अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या शाळांमुळे मनस्ताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:41 IST

सुरेश लोखंडे ठाणे : शासनाने एप्रिलच्या या कडकडीत उन्हाळ्यातही शाळा पूर्ण दिवस सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले; पण आता ...

सुरेश लोखंडे

ठाणे : शासनाने एप्रिलच्या या कडकडीत उन्हाळ्यातही शाळा पूर्ण दिवस सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले; पण आता त्यातही सुधारणा करून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शाळांना त्यांच्या परीक्षा वेळेत घेऊन सुटी घेता येणार आहे; पण ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. त्यांना मात्र एप्रिलच्या कडक उन्हातही अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घ्याव्या लागणार आहे. या शाळांच्या निष्काळजीमुळे पालकांना रेल्वेच्या आरक्षणाचे बुकिंग रद्द करण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कोरोनामुक्त झाल्याचे घोषित करून सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर यातून मुक्तता झाल्यामुळे आता पालकांनी गावी किंवा मुलांनी मामाच्या गावी जाण्याचा बेत आखलेला आहे. त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी रेल्वेचे बुकिंग ही पालकांनी केले आहे; मात्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा सुरूच ठेवण्याचे अध्यादेश जारी केला होता. त्यामुळे पालकांना रेल्वेच्या आरक्षणाचे बुकिंग रद्द करण्याचा प्रसंग ओढवला होता; पण जारी केलेल्या अध्यादेशात सुधारणा करून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शाळांनी त्यांच्या परीक्षा नियमितपणे घेऊन त्यांच्या पातळीवर सुटी घेण्याचे अधिकार दिले आहेत; पण अभ्यासक्रम पूर्ण नसलेल्या शाळांनी परीक्षा घेण्यासाठी प्रथम या महिन्यातच अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शासनाने अध्यादेशात बदल करूनही निष्काळजी करणाऱ्या शाळांमुळे बहुतांशी पालकांना त्यांचे रेल्वेच्या आरक्षणाचे बुकिंगसह अन्यही नियोजन रद्द करण्याची वेळ आली आहे.

१) तापमान ३५ ते ४० अंशांवर

सध्या जिल्ह्याचे तापमान ३५ ते ४० अंशांवर आहे. त्यामुळे या कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. त्यात अधूनमधून या तापमानात बदल होत असल्याचे हवामान खात्याकडून सूचित करण्यात येत आहे. त्यामुळेही पालकांचा जीव टांगणीवर आहे.

२) मुलांचे आरोग्य बिघडले तर काय करणार?

जीवघेण्या उन्हाच्या कडाक्यात मुलांना दिवसभर शाळेत जावे लागणार आहे. त्यातही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जादा तास आणि त्यानंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची घोकमपट्टी करावी लागणार आहे. त्यामुळे दडपण येऊन मुलांचे आरोग्य बिघडण्याची शंका-कुशंका पालकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

३) एक मे पासून सुट्या -कोरोनामुळे दोन वर्षांपासून गावी जाऊन मनसोक्त राहता आलेले नाही; पण आता ती संधी आलेली असली तरी बालकांच्या अभ्यासक्रमासाठी आणि परीक्षांसाठी पालकांना एप्रिल महिना तणावाखालीच काढावा लागणार आहे. त्यानंतर १ मेपासूनच या कुटुंबीयांना उन्हाळ्याची सुटी घेता येणार आहे.

शिक्षक संघटना पदाधिकारी प्रतिक्रिया -

उन्हाचा पारा चाळिशीवर गेला असताना पूर्णवेळ शाळेत बसणाऱ्या लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा. शाळेत होणारी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया उकाड्यामुळे सुरळीत होणार नाही. तर मग पूर्णवेळ शाळेचा हट्ट का? शाळा सकाळच्या सत्रातच भरवल्या जाव्यात.

विजय शिंदे,संयुक्त राज्य कार्यवाहक, शिक्षक भरती

‘शाळेत पूर्णवेळ थांबून अध्यक्ष करतील’

उन्हाचा तडाखा खूपच वाढला आहे. उकाड्यामुळे सर्वसामान्य हैराण असताना लहान मुले त्यात शाळेत पूर्णवेळ थांबून अध्ययन करतील का? याबाबत मला शंका वाटते. उन्हाचा विचार करून शाळा सकाळ सत्रातच भरविल्या जाव्यात.

- रोहिदास गोदडे, भावसे, ता. शहापूर

मुलांना उन्हाचा होतोय त्रास

शाळांना पूर्ण तासिका घ्यायचे आदेश असल्याने शाळा भर दुपारी सोडल्या जात आहेत. त्यामुळे मुले दुपारी उन्हात खेळत उड्या मारत घरी येत आहेत. याचा त्यांना त्रास होत आहे. मुलांच्या आरोग्याचा व मानसिकतेचा विचार करून शाळा सकाळ सत्रात भरून ११.३० पर्यंत सोडल्या जाव्यात.

- रवींद्र जाधव, पालक-भिवंडी

परीक्षा घेतल्यानंतरच सुटी शासनाने जारी केलेल्या अध्यादेशात बदल करून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शाळांना त्यांच्या परीक्षा वेळेत घेऊन सुटी घेण्यास सांगितले आहे; पण अभ्यासक्रम पूर्ण न केलेल्या शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करूनच परीक्षा घेतल्यानंतर सुटी घेण्याचे सूचित केलेले आहे.

- ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे