शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे, वाहनचालकांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:53 AM

पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे.

कल्याण : पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनीच पुढाकार घेऊन सोमवारी दगड, विटांचा चुरा टाकून खड्डा बुजविण्याचे काम केले.शहरातील जुना ऐतिहास पत्रीपूल पाडल्याने त्याला समांतर असलेल्या अरुंद रेल्वे उड्डाणपुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या पुलावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी प्लास्टिकचे दुभाजक लावले आहेत. मात्र, त्यांचीही दूरवस्था झाली आहे. या पुलावरून नागरिक व प्रवासी, वाहनचालक दररोज वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. त्यामुळे हैराण असलेल्या वाहनचालकांना आता पुलावरील खड्ड्यांचाही सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे.कल्याण-शीळ रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. मे महिन्यात महामंडळाने खड्डे बुजवले. मात्र, आता पावसामुळे पुलावर खड्डे पडले असून, ते बुजविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. मागच्या वर्षी खड्ड्यांमुळे कल्याण शहरात पाच जणांचा बळी गेला होता. त्यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळ, महापालिका, एमआयडीसी, बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत होते. पालकमंत्र्यांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित न करता रस्ता सुस्थितीत करणे महत्त्वाचे आहे, असे ठणकावून सांगितले होते. आता पत्रीपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारानंतर तरी या सरकारी संस्थांना जाग येणार आहे का, असा सवाल केला जात आहे.>वाहतुकीमुळे काम करणे अवघडमहापालिका हद्दीतील सर्व रेल्वे उड्डाणपुलावर मास्टीक अस्फाल्टींग शीट बसविली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांनी सांगितले होते. मात्र, पत्रीपुलावर मास्टीक अस्फाल्टींगचे काम करण्यासाठी जागाच नाही. तसेच सतत वाहतूक होत असल्याने येथे हे काम होऊ शकलेले नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणेने रात्रीच्या वेळी करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पुलावरून महापालिकेचे पदाधिकारी आलिशान गाड्यांतून प्रवास करतात. मात्र, त्यांना पुलावरील खड्डे दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे.