शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

ठाणे  जिल्ह्यात पर्यटनबंदी! जिल्हाधिकाऱ्यांच्या फर्मानाने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 4:26 AM

ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ठाणे  - एकीकडे सरकार राज्यातील नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा विचार करीत असताना पावसाळ्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यावर उपाययोजना शोधण्याऐवजी कामचुकार प्रशासनाने अशा रीतीने थेट पर्यटनावरच निर्बंध आणल्याने पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हाधिकाºयांच्या या तुघलकी फर्मानामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक व्यावसायिकांच्या पावसाळ्यातील रोजगारावरच गदा आली आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात, म्हणून त्या त्याठिकाणचे स्थानिक बेरोजगार तात्पुरते ढाबे, टेंट टाकून काकडी, चिंचा, बिस्किटे, चहा, कॉफीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात, रानभाज्या विकतात. यातून त्यांना तात्पुरता रोजगार मिळतो. शिवाय, लांबवरून आलेल्या पर्यटकांची सोयही होते. काही ठिकाणी पर्यटक मुक्कामाला येत असल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकांच्याही व्यवसायावर यामुळे गदा येणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनी जिल्हाधिकाºयांच्या या फर्मानाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून ते मागे घेण्याची मागणी केली आहे.मनाईस्थळं१ ठाणे तालुक्यातील येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपासवरील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरकिनारा२ कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, सुभेदारवाडा, गणेशघाट चौपाटी३ मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली गोरखगड, सिंगापूर नाणेघाट, धसई धरण, आंबेटेंबे४भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर.५ शहापूर तालुक्यातील भातसा धरणस्थळ, कुंडन, दहिगाव, माहुली किल्ला, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत, सापगाव नदी, कळंबे नदीकिनारा.काहींकडून स्वागत या सर्व ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांना धबधब्यावर जाणे, खोल पाण्यात उतरणे, दरीचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे, मद्य बाळगणे, मद्यधुंद होऊन प्रवेश करणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, धबधब्याच्या परिसरात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने घेऊन जाणे, ध्वनी, वायू, जलप्रदूषण करणे, अशा बाबीस प्रतिबंध केला, तो स्वागतार्ह असल्याचे काही ठाणेकरांचे मत आहे.पर्यटकांत संताप : अशा प्रकारे पर्यटनस्थळच नव्हे, तर त्यापासून एक किमीपर्यंतच्या परिघात जाण्यास मनाई करण्याऐवजी प्रशासनाने सुरक्षा यंत्रणेसह आपले कर्मचारी धांगडधिंगा करणाºया पर्यटकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना सरसकट सर्वांना तेथे जाण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत आहे....तर कल्याण-नगर मार्गच बंद होईलपर्यटनस्थळांच्या एक किमी परिघात पर्यटनबंदी म्हणजे नागरिकांनी जिल्ह्यातून कुठेच प्रवास करायचा नाही का? कारण बहुतेक पर्यटन स्थळे महामार्ग, राज्यमार्गांच्या एक किमी परिघात आहेत. माळशेज घाटातील बंदीमुळे तर कल्याण-नगर मार्गच बंद होईल.

टॅग्स :tourismपर्यटनnewsबातम्या