शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

मीरा-भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या लोकांची संख्या 342वर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 09:14 IST

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली ...

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली आढळून आलेले नाही. तर शहरात परदेशातून येणा-या नागरिकांची विमानतळ प्राधिकरण व शासनाकडून वेळीच माहिती मिळत नसल्याने आलेल्या नागरिकांची माहिती पालिकेला वेळीच होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.परदेशातुन आलेल्या परंतु कोरोना नसलेल्या नागरिकांना खबरदारी म्हणून १४ दिवसांकरिता अलगीकरण केंद्रात ठेवण्याची आवश्यकता आहे. मीरा भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ३४२ झालेली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली नसली तरी खबरदारी म्हणुन १४ दिवसांकरीता वेगळे ठेवण्याची आवश्यकता असल्याने पालिकेने भाईंदर पूर्वेला पालिका क्रीडा संकुलासमोरील इमारतीत अलगीकरण केंद्र सुरू केले आहे. तेथे सदद्या २५ नागरिकांना खबरदारी म्हणून वेगळे ठेवलेले आहे. २३६ जणांना त्यांच्या राहत्या घरीच ठेवलेले आहे. यातील ८१ जणांनी १४ दिवसांचा वेगळा राहण्याचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. ८ जणांना कस्तुरबा येथे तपासणी साठी पाठवले असता ६ जणांना कोरोनाची लागण नसल्याचा अहवाल आला आहे. तर दोघांचा अहवाल आला नसुन त्यांना सद्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले आहे.शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व पालिका - शासनांच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान परदेशातुन येणाराया नागरिकांची माहिती पालिकेला मिळत नसुन आुबाजुचे रहिवाशीच असे कोणी आले की पालिकेला कळवत आहेत. त्यातही पालिके कडुन अशा लोकांशी वेळीच संपर्क केला जात नसल्याचे काही प्रकरणात समोर आले आहे. तर असे काही नागरिक परदेशातुन आले तर त्यांच्या कडे जाण्यासाठी वैद्यकिय पथकां कडे स्वतंत्र वाहनेच नसल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेच्या गाड्या गेल्या कुठे असा सवाल देखील केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस