शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

मीरा-भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या लोकांची संख्या 342वर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 09:14 IST

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली ...

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली आढळून आलेले नाही. तर शहरात परदेशातून येणा-या नागरिकांची विमानतळ प्राधिकरण व शासनाकडून वेळीच माहिती मिळत नसल्याने आलेल्या नागरिकांची माहिती पालिकेला वेळीच होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.परदेशातुन आलेल्या परंतु कोरोना नसलेल्या नागरिकांना खबरदारी म्हणून १४ दिवसांकरिता अलगीकरण केंद्रात ठेवण्याची आवश्यकता आहे. मीरा भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ३४२ झालेली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली नसली तरी खबरदारी म्हणुन १४ दिवसांकरीता वेगळे ठेवण्याची आवश्यकता असल्याने पालिकेने भाईंदर पूर्वेला पालिका क्रीडा संकुलासमोरील इमारतीत अलगीकरण केंद्र सुरू केले आहे. तेथे सदद्या २५ नागरिकांना खबरदारी म्हणून वेगळे ठेवलेले आहे. २३६ जणांना त्यांच्या राहत्या घरीच ठेवलेले आहे. यातील ८१ जणांनी १४ दिवसांचा वेगळा राहण्याचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. ८ जणांना कस्तुरबा येथे तपासणी साठी पाठवले असता ६ जणांना कोरोनाची लागण नसल्याचा अहवाल आला आहे. तर दोघांचा अहवाल आला नसुन त्यांना सद्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले आहे.शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व पालिका - शासनांच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान परदेशातुन येणाराया नागरिकांची माहिती पालिकेला मिळत नसुन आुबाजुचे रहिवाशीच असे कोणी आले की पालिकेला कळवत आहेत. त्यातही पालिके कडुन अशा लोकांशी वेळीच संपर्क केला जात नसल्याचे काही प्रकरणात समोर आले आहे. तर असे काही नागरिक परदेशातुन आले तर त्यांच्या कडे जाण्यासाठी वैद्यकिय पथकां कडे स्वतंत्र वाहनेच नसल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेच्या गाड्या गेल्या कुठे असा सवाल देखील केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस