शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 00:35 IST

टोल रद्द करा : अन्यायकारक वसुली रोखण्याची केली मागणी

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊननंतर रस्ते टोलमुक्त करणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी टोलची दरवाढ केली असून, १०० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. या मुद्द्याला टोलवसुलीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे श्रीनिवास घाणेकर यांनी हरकत घेतली आहे. सामान्यांना टोलच्या जाचातून मुक्त करण्याऐवजी जास्तीचा टोल लादला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

घाणेकर यांची टोलवसुलीच्या विरोधातील याचिका २०१२ पासून न्यायप्रविष्ट आहे. ते म्हणाले की, लोकल बंद असल्याने नागरिकांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने केलेली टोल दरवाढ ही अत्यंत चुकीची आहे. दरवाढच काय याआधी आकारला जात असलेला टोल रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेणे गरजेचे होते. मुंबईच्या एण्ट्री पॉइंटवरील मुलुंड आनंदनगर, मुलुंड एलबीएस, वाशी, दहिसर आणि ऐरोली येथील पाच टोलनाक्यांवर आजही टोलवसुली सुरू आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीत उड्डाणपूल, अंडरपास बांधण्यासाठी एक हजार ५६० कोटी रुपये खर्च झाला होता. पहिल्या चार वर्षांत ४२७ कोटी रुपये, तर नंतर ३८९ कोटी रुपये टोलवसुली करण्यात आली. मात्र, ज्या वाहनांना टोलनाका ओलांडावा लागत नाही, अशा वाहनांना प्रतिलीटर डिझेल व पेट्रोलमागे एक रुपया उपकर लावण्यात आला....मग पुन्हा टोल का?च्बांधकामासाठी झालेला खर्च हा एक हजार ५६० कोटी होता. तर, टोल व उपकराच्या माध्यमातून सरकारला दोन हजार १६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. खर्चाची रक्कम वसूल झाली असताना एमईपी कंपनीकडून सरकारने दोन हजार १०० कोटी रुपये भरून घेतले आहेत. या कंपनीला आता २०२७ पर्यंत टोलवसुलीचे काम दिले आहे. ही कंपनी २०१७ पर्यंत दोन हजार १०० कोटींच्या बदल्यात ११ हजार ८७० कोटी रुपये वसूल करणार आहे.च्वसूल केलेली रक्कम सरकारी तिजोरीत न जाता कंपनीला मिळणार आहे. बांधकाम खर्चाची रक्कम वसूल झालेली असताना पुन्हा टोलवसुलीचे काम देण्यात सरकारला काय स्वारस्य आहे. टोल दरवाढ झाल्याने मुंबईत प्रवेशासाठी आता जास्त टोल भरावा लागणार आहे. या प्रकरणीही घाणेकर यांनी हरकत घेतली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे