शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

टीएमटीचे प्रवासी घटले

By admin | Updated: December 22, 2016 06:07 IST

ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत असताना प्रवाशांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. प्रवाशांची संख्या २ लाख ४०

ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत असताना प्रवाशांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजारांवरून थेट १ लाख ६८ हजारांवर आली आहे. अनेक बस या किरकोळ दुरुस्तीच्या कारणांमुळे डेपोतून बाहेर पडत नसल्याने प्रवासी संख्या घटत असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ही बाब समोर आली आहे. या अहवालात टीएमटीचादेखील तपशील दिला आहे. मागील तीन वर्षांत प्रवाशांची संख्या सातत्याने घसरत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.त्यातही पर्यावरण संवर्धनासाठी सीएनजीच्या बसला प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी २०१२-१३ मधील सीएनजी बसची संख्या १२८ इतकीच आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसची संख्या मात्र १८५ वरून २२५ इतकी वाढली आहे. बस वाढल्या असल्या तरी डिझेलचा वापर मात्र कमी झाला आहे. २०१२-१३ मध्ये १८५ बससाठी ९ हजार ५१६ लीटर डिझेल वापरले जात होते. तर, यंदा बस २२५ असल्या तरी डिझेलचा खप ८ हजार ९७० इतका आहे. त्यामुळे बस रस्त्यावर धावत नसल्याचे स्पष्ट होत आहे. टीएमटीच्या सुमारे ८० च्या आसपास बस या दुरुस्तीअभावी कार्यशाळेतच धूळखात पडून असतात. किरकोळ साहित्यसुद्धा दुरुस्तीसाठी उपलब्ध होत नाही. कामचुकार कर्मचारी बसेसच्या मेंटनन्सकडे लक्ष देत नाही. अधिकाऱ्यांचे बससेवा आणि येथील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. असे अनेक मुद्दे या अहवालात नमूद केले आहेत. २०१२-१३ मध्ये टीएमटी बसेसचे ७४ अपघात नोंदवले गेले होते. त्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, २०१३-१४ मध्ये ६२ अपघात झाले असून त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर, मागील वर्षी ७५ अपघातांत चौघांचा मृत्यू झाला. यंदा ५९ अपघातांमध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. निवृत्तीमुळे टीएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. (प्रतिनिधी)