शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

टीएमटीचे प्रवासी घटले

By admin | Updated: December 22, 2016 06:07 IST

ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत असताना प्रवाशांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. प्रवाशांची संख्या २ लाख ४०

ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत असताना प्रवाशांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजारांवरून थेट १ लाख ६८ हजारांवर आली आहे. अनेक बस या किरकोळ दुरुस्तीच्या कारणांमुळे डेपोतून बाहेर पडत नसल्याने प्रवासी संख्या घटत असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ही बाब समोर आली आहे. या अहवालात टीएमटीचादेखील तपशील दिला आहे. मागील तीन वर्षांत प्रवाशांची संख्या सातत्याने घसरत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.त्यातही पर्यावरण संवर्धनासाठी सीएनजीच्या बसला प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी २०१२-१३ मधील सीएनजी बसची संख्या १२८ इतकीच आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसची संख्या मात्र १८५ वरून २२५ इतकी वाढली आहे. बस वाढल्या असल्या तरी डिझेलचा वापर मात्र कमी झाला आहे. २०१२-१३ मध्ये १८५ बससाठी ९ हजार ५१६ लीटर डिझेल वापरले जात होते. तर, यंदा बस २२५ असल्या तरी डिझेलचा खप ८ हजार ९७० इतका आहे. त्यामुळे बस रस्त्यावर धावत नसल्याचे स्पष्ट होत आहे. टीएमटीच्या सुमारे ८० च्या आसपास बस या दुरुस्तीअभावी कार्यशाळेतच धूळखात पडून असतात. किरकोळ साहित्यसुद्धा दुरुस्तीसाठी उपलब्ध होत नाही. कामचुकार कर्मचारी बसेसच्या मेंटनन्सकडे लक्ष देत नाही. अधिकाऱ्यांचे बससेवा आणि येथील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. असे अनेक मुद्दे या अहवालात नमूद केले आहेत. २०१२-१३ मध्ये टीएमटी बसेसचे ७४ अपघात नोंदवले गेले होते. त्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, २०१३-१४ मध्ये ६२ अपघात झाले असून त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर, मागील वर्षी ७५ अपघातांत चौघांचा मृत्यू झाला. यंदा ५९ अपघातांमध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. निवृत्तीमुळे टीएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. (प्रतिनिधी)