शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

टँकरलॉबीचे झाले उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:26 IST

बदलापूरमध्ये टंचाई : १२०० ते १५०० रुपयांत होत आहे विक्री, रहिवाशांच्या खिशाला भुर्दंड

बदलापूर : बदलापूरमध्ये महिनाभरापासून टँकरलॉबी मोठ्या प्रमाणात नफेखोरी करण्यात व्यस्त झाली आहे. शहरातील अनेक इमारतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक सोसायट्या या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहत आहेत. त्यामुळे या सोसायटीच्या पत्रावर टँकरमालक जीवन प्राधिकरणाकडून २२० रुपयांमध्ये टँकर भरून घेतात आणि त्या टँकरची १२०० ते १५०० विक्री करतात. पाणीटंचाईचा सर्वात मोठा फायदा हा बदलापुरातील टँकरलॉबी घेत आहे. दुसरीकडे बदलापुरातील पाणीटंचाई पाहता रोज २५० ते ३०० टँकरची गरज आहे. ती पुरवण्याची क्षमता पालिका आणि जीवन प्राधिकरणाकडे नाही. त्यामुळे बाहेरील टँकरलॉबी आपले टँकर हे २५०० ते ३०००मध्ये पाणी विकत आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पालिका प्रशासन यांना शहरातील पाणीटंचाई दूर करण्यात अपयश आले आहे. शहरात अनेक इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याने त्या सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. शहरात अनेक इमारती केवळ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तर, काही सोसायट्यांमध्ये कूपनलिका असून पिण्यासाठी नागरिकांना टँकरचे पाणी मागवावे लागत आहे. शहरात रोज २५० ते ३०० टँकर पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात एवढे टँकर देण्याची परवानगी जीवन प्राधिकरणाकडे नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या सोसायट्यावगळता इतर ठिकाणी पाणी टँकरने देणे शक्य होत नाही.

बदलापूरमधील खरवई येथील जीवन प्राधिकरणाच्या केंद्रातून रोज ५० टँकर देण्याची परवानगी आहे. त्यासाठी प्राधिकरण २२० रुपये आकारत आहे. मात्र, आठ ते दहा हजार लीटर क्षमतेचे टँकर नागरिकांना १२०० ते १५०० रुपयांना मिळत आहे. पाण्याची गरज असल्याने सोसायट्याही वाढीव दराने हे पाणी घेत आहेत. टँकरमालकाला प्रत्येक टँकरमागे हजार रुपये मिळतात. टँकरचा डिझेल आणि चालकाचा पगार वगळता इतर पैसे टँकरमालकाला मिळतात. एक टँकर दिवसाला पाच ते सहा फेऱ्या करतो. त्यामुळे टँकरमालकाला एका टँकरमागे पाच ते सहा हजारांचा नफा होतो. टँकरलॉबी सक्रिय झाल्याने प्राधिकरण आणि पालिकेने स्वत: नेमलेल्या टँकरद्वारेच टंचाईग्रस्त भागाला पाणी देण्याची मागणी होत आहे. तसेच टँकरवर जीपीएस यंत्रणा नसल्याने कोणते टँकर कुठे पाणी टाकतात, याची माहिती कुणालाच मिळत नाही.

खरवई येथून ५०, बदलापूर अग्निशमन केंद्र येथून ५० असा रोज १०० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पुरवठा करणाऱ्या टँकरपैकी सर्व टँकर हे राजकीय नेत्यांचे आहेत. ज्या भागातील सोसायट्यांना पाणीच नाही, त्या सोसायट्या मिळेल त्या दरात टँकर मागवत आहेत. शहरातील इतर टँकरलॉबी सरासरी अडीच ते तीन हजारांत टँकर देत आहेत. काही टँकरचालक उल्हास नदीतून पाणी उचलून ते थेट पिण्याचे पाणी म्हणून सोसायटीला देतात. ज्या भागात पाणीच येत नाही, त्यांना काही टँकरचालक उल्हास नदीचे पाणी देतात. बांधकामासाठीही तेच पाणी दिले जाते. बदलापूरमध्ये प्रत्येक विभागात टँकरलॉबी सक्रिय झाली असून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त होत आहे.बदलापूरमध्ये अनेक सोसायट्यांना टँकरची गरज लागते. २५० ते ३०० टँकरची गरज असताना त्यांना स्वस्तात टँकर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. इतकेच नव्हे तर बदलापूर शहर टंचाईग्रस्त शहर म्हणून जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे. - शैलेश वडनेरे, नगरसेवकपालिकेवर मुजोरीबदलापूरमध्ये एक टँकर भरण्यासाठी प्राधिकरण २२० रुपये आकारते. ते पाणी घेऊन पालिकेचे टँकर ६०० रुपयांत नागरिकांना पाणीपुरवठा करतात.च्मात्र, टँकरलॉबीची मुजोरी इतकी वाढली आहे की, पालिकेचा स्वस्त टँकर तसाच उभा ठेवला जातो.च्तो टँकर न वापरता खाजगी टँकर वापरण्याची यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यामुळे पालिकेचे स्वस्त टँकर बाहेरच पडत नाही.