शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

टिएमटीचे उत्पन्न वाढले मात्र बसेसची रस्त्यावरील संख्या घटली, खाजगी कंत्राटदाराच्या भरवशावर टिएमटीची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 16:00 IST

ठाणे परिवहन प्रशासन सध्या खाजगी ठेकेदारावर जास्तीच मेहरबान झाल्याचे दिसत आहे. परिवहनच्या स्वत:च्या केवळ ८० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत असून, ठेकेदाराच्या मात्र तब्बल १६२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्न वाढल्याचे दिसत असले तरी देखील त्यात ठेकेदाराच्या उत्पन्नावरच परिवहनची मदार असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपरिवहनची मदार खाजगी ठेकेदाराच्या उत्पन्नावरपरिवहनच्या ३१७ पैकी केवळ ८० च्या आसपास बसेस रस्त्यावरखाजगीकरणाचा घाट घातल्याचा होतोय आरोप

ठाणे - एकीकडे ठाणे परिवहन सेवा सुधारण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रयत्न सुरु असल्याने त्याचा फायदा देखील परिवहनला झाला आहे. परिवहनचे उत्पन् आजच्या घडीला २५ लाखांच्या वर गेले आहे. परंतु, परिवहनच्या स्वत:च्या ३१७ बसेसपैकी अवघ्या वागळे आणि कळवा आगारातून अवघ्या ८० बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दिवसाला ब्रेकडाऊनचे प्रमाण ५० च्या आसपास असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे परिवहनच्या बसेस रस्त्यावर कमी झाल्या असल्यातरी देखील खाजगी ठेकेदाराच्या तब्बल १६२ रस्त्यावर धावत असल्याची माहिती परिवहनने दिली आहे. याचाच अर्थ परिवहनची मदार सध्या खाजगी ठेकेदाराच्या हाती आली असून त्याच्यावर परिवहनच्या उत्पन्नाचा गाडा हाकला जात आहे. परंतु यामुळे परिवहनचे बसेसचे प्रमाण असेच जर कमी होत राहिले तर कालांतराने परिवहनचे खाजगीकरण होण्यास वेळ लागणार नसल्याचा धक्कादायक आरोप आता होऊ लागला आहे.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी १९८९ च्या सुमारास ठाणे परिवहनची सुरवात केली होती. त्यावेळेस २५ बसेस होत्या. आज त्याच बसेसची संख्या ३०० हून अधिक झाली आहे. परंतु तरी देखील ठाणेकरांना या बसेस कमी पडत आहेत. एकीकडे कार्यशाळेतील अकुशल कर्मचाऱ्याच्या बाबत आक्षेप घेतला जात असतांना दुसरीकडे परिवहनच्या हक्काच्या बसेसची संख्या रस्त्यावर मात्र रोडावलेली दिसत आहे.परिवहनच्या ताफ्यात तब्बल ३१७ बसेस आहेत. परंतु असे असतांना ही रस्त्यावर मात्र ८० बसेस धावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे परिवहनच्या चालकांना बसेस नसल्याने आगारातच बसावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तासनतास बसून त्यांना आपला दिवस घालवावा लागत आहे. परिवहनमध्ये १९०० च्या आसपास कामगार आहेत. परंतु बसेसच रस्त्यावर तुरळक धावत असल्याने या कर्मचाºयांवर देखील भविष्यात गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिवहनच्या ३१७ पैकी वागळे आगारातून ५५ ते ५८ च्या आसापास बसेस रस्त्यावर सध्यस्थितीत धावत आहेत. पुर्वी हीच संख्या १३० च्या आसपास होती. बसेसची संख्या रोडावल्याने त्याचा उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. कळवा आगारात आजच्या घडीला ६० च्या आसपास बसेस आहेत. परंतु प्रत्यक्षात १८ बसेस रस्त्यावर उतरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे उत्पन्न देखील ५ ते १० लाखांनी कमी झाले आहे.*परंतु दुसरीकडे खाजगी ठेकेदाराच्या बसेस मात्र नियमितपणे रस्त्यावर धावत असून त्यांच्या आजच्या घडीला १६२ च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यांचे उत्पन्न मात्र भरघोस वाढू लागले आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या  हिस्यावरच सध्या परिवहनची मदार आली आहे. यामुळे परिवहनला मिळणाºया उत्पन्नाचा आकडा देखील फुगला असल्याचे बोलले जात आहे.

  • परिवहनच्या कळवा आणि वागळे आगारातून रोज निघाणाऱ्या  बसेस अर्ध्यातूनच परत येत असून बसेस ब्रेकडाऊनचे प्रमाण हे ५० हून अधिक झाले आहे.
  • परिवहनच्या बसेस रस्त्यावर उतरण्याबाबतही काही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी कळवा आगारात पुढचा टायर मागच्या बाजून लावण्याचा प्रकार घडला होता. यामुळे अपघात देखील झाला होता.

 

  • या संदर्भात परिवहन समिती सदस्य सचिन शिंदे यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. केवळ खाजगी ठेकेदाराची बेगमी करण्यासाठी आणि परिवहनला येत्या काळात बंद करुन खाजगीकरणाचा घाट घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त