शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

आरोग्यसेवेचे वाजले उल्हासनगरमध्ये तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 03:24 IST

शहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते.

- सदानंद नाईकशहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, उल्हासनगर पालिकेला याचा विसर पडलेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार आरोग्यासाठी विविध योजना राबवत आहे. मात्र, उल्हासनगर पालिकेत सत्तेत असलेली भाजपा आरोग्याच्या दृष्टीने कुठलीच पावले उचलताना दिसत नाही. हाच का पारदर्शक कारभार, असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे.औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगरमधील आरोग्यसेवा कागदावरच असल्याने शहरच व्हेंटिलेटरवर आहे. नऊ लाख लोकसंख्येसाठी पालिकेचे एकही मोठे रुग्णालय नसून आरोग्याची सर्व मदार आरोग्य केंद्रावर आहे. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र बंद असून इतरांची दुरवस्था झाली आहे. तेथील चित्र पाहिले तर ही आरोग्य केंदे्र नसून कचराकुंडी वाटावी इतकी तिथे घाण, दुर्गंधी पसरलेली आहे.महापालिकेने अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेले रूग्णालय उभारण्यासाठी महासभेत अनेकदा प्रस्ताव मंजूर केले. मात्र, रुग्णालयासाठी मंजूर केलेली जागा कालांतराने भूमाफियांनी घशात घातली. सत्ताधाºयांसह विरोधी पक्ष याविरोधात आवाज उठवत नसल्याने रुग्णालय उभे राहू शकले नाही. यातूनच सामान्यांबद्दल नेते, प्रशासन यांना काहीही वाटत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारच्या दबावापोटी लोकसंंख्येच्या प्रमाणात महापालिका आरोग्य विभागाने सहा ठिकाणी आरोग्य केंदे्र सुरू केली, तर चार ठिकाणी प्रस्तावित आरोग्य केंदे्र असून काही ठिकाणी केंद्रांच्या इमारतींचे काम सुरू आहे. आरोग्य केंद्रात नागरिकांवर प्राथमिक उपचार केले जातात. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र तर खंडहर बनली असूनही ते कागदावर सुरू असल्याचे दाखवले जात आहे. राज्य सरकारच्या मध्यवर्ती रुग्णालयामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत आहेत, इतकेच काय ते समाधान. पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असते. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचारी, डॉक्टर व मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. महापालिकेकडे फक्त तीन डॉक्टर, तीन परिचारिका व इतर कर्मचारी स्थायी स्वरूपाचे असून इतर कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका ठोस वेतनावर घेतले आहेत. आरोग्य, औषधखरेदी व आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी सुविधा पुरवण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाचे आहे. मात्र, विभागाचे बजेट जेमतेम एक ते दीड कोटीचे आहे. एवढ्या कमी बजेटमध्ये शहरातील नऊ लाख लोकसंख्येला कशी आरोग्य सुविधा पुरविणार, हा खरा प्रश्न आहे. पावसाळ्यात आपत्कालीन कक्षाची स्थापना महापालिकेला मध्यवर्ती रुग्णालयात करावी लागते. तसेच इतर सुविधांसाठी मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते, अशी दयनीय अवस्था पालिकेच्या आरोग्य विभागाची झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर