शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

आरोग्यसेवेचे वाजले उल्हासनगरमध्ये तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 03:24 IST

शहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते.

- सदानंद नाईकशहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, उल्हासनगर पालिकेला याचा विसर पडलेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार आरोग्यासाठी विविध योजना राबवत आहे. मात्र, उल्हासनगर पालिकेत सत्तेत असलेली भाजपा आरोग्याच्या दृष्टीने कुठलीच पावले उचलताना दिसत नाही. हाच का पारदर्शक कारभार, असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे.औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगरमधील आरोग्यसेवा कागदावरच असल्याने शहरच व्हेंटिलेटरवर आहे. नऊ लाख लोकसंख्येसाठी पालिकेचे एकही मोठे रुग्णालय नसून आरोग्याची सर्व मदार आरोग्य केंद्रावर आहे. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र बंद असून इतरांची दुरवस्था झाली आहे. तेथील चित्र पाहिले तर ही आरोग्य केंदे्र नसून कचराकुंडी वाटावी इतकी तिथे घाण, दुर्गंधी पसरलेली आहे.महापालिकेने अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेले रूग्णालय उभारण्यासाठी महासभेत अनेकदा प्रस्ताव मंजूर केले. मात्र, रुग्णालयासाठी मंजूर केलेली जागा कालांतराने भूमाफियांनी घशात घातली. सत्ताधाºयांसह विरोधी पक्ष याविरोधात आवाज उठवत नसल्याने रुग्णालय उभे राहू शकले नाही. यातूनच सामान्यांबद्दल नेते, प्रशासन यांना काहीही वाटत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारच्या दबावापोटी लोकसंंख्येच्या प्रमाणात महापालिका आरोग्य विभागाने सहा ठिकाणी आरोग्य केंदे्र सुरू केली, तर चार ठिकाणी प्रस्तावित आरोग्य केंदे्र असून काही ठिकाणी केंद्रांच्या इमारतींचे काम सुरू आहे. आरोग्य केंद्रात नागरिकांवर प्राथमिक उपचार केले जातात. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र तर खंडहर बनली असूनही ते कागदावर सुरू असल्याचे दाखवले जात आहे. राज्य सरकारच्या मध्यवर्ती रुग्णालयामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत आहेत, इतकेच काय ते समाधान. पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असते. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचारी, डॉक्टर व मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. महापालिकेकडे फक्त तीन डॉक्टर, तीन परिचारिका व इतर कर्मचारी स्थायी स्वरूपाचे असून इतर कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका ठोस वेतनावर घेतले आहेत. आरोग्य, औषधखरेदी व आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी सुविधा पुरवण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाचे आहे. मात्र, विभागाचे बजेट जेमतेम एक ते दीड कोटीचे आहे. एवढ्या कमी बजेटमध्ये शहरातील नऊ लाख लोकसंख्येला कशी आरोग्य सुविधा पुरविणार, हा खरा प्रश्न आहे. पावसाळ्यात आपत्कालीन कक्षाची स्थापना महापालिकेला मध्यवर्ती रुग्णालयात करावी लागते. तसेच इतर सुविधांसाठी मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते, अशी दयनीय अवस्था पालिकेच्या आरोग्य विभागाची झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर