शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कोरोनाला वाकुल्या दाखवून वर्षभरात झाले तीन हजार ८३७ विवाह; ठाण्यात दिवाळीनंतर विवाहांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:59 IST

ठाण्यात दिवाळीनंतर विवाहांची संख्या वाढली

स्नेहा पावसकर  ठाणे : गेल्या वर्षी कोरोना आला आणि आपण सगळेच लॉकडाऊनमुुळे घरात बसलो. पण काही महिने जसे हळूहळू अनलॉक होऊ लागले तसे पुन्हा एकदा कार्यालये, व्यवहार, उत्सव, सोहळ्यांना थोडक्या माणसांमध्ये करण्याची परवानगी मिळू लागली. कोरोनाची धास्ती तर गेले वर्षभर आपण घेऊन फिरतोय. पण त्यातही त्याच कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या मार्चपासून ते या मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात सुमारे ३,८३७ जोडप्यांनी रजिस्टर्ड मॅरेज केले.

कोरोना महामारीला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. मध्यंतरीच्या काळात सण, उत्सव, घरगुती सोहळे, विवाह यांना मोजक्या माणसात करण्याची मुभा दिली होती. तसे नियम घातले होते. काही ठिकाणी हे नियम मोडले गेले खरे; पण ठाणे जिल्ह्यात मात्र गेल्या वर्षभरात नियम पाळत लग्नसोहळे झाले. 

विशेष म्हणजे वारेमाप खर्च टाळण्याच्या दृष्टीने आणि कमी माणसांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने अनेकांनी नोंदणी करून रजिस्टर्ड मॅरेज करण्यावर भर दिलेला पाहायला मिळाला. २०२० मध्ये एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन होता. परिणामी कोणीही घराबाहेर पडले नाही किंवा लग्नाच्या दृष्टीने नियोजन केले नाही. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये एकही विवाह ठाण्यात झाला  नाही. तर तुलसी विवाहानंतर मुहूर्त पाहून अनेकांनी लग्नाचा बार उडवला. इतकेच काय तर मुहूर्त नसतानाही गेल्यावर्षी अनेकांनी लग्नसोहळे उरकले.

अनेकांचे विवाह लांबणीवर 

गेल्यावर्षी अनलॉकनंतर काही प्रमाणात विवाह सोहळे झाले. मात्र ते अगदी नगण्य होते. अन्यथा आमच्याकडे एकाच दिवशी खूप विवाह होतात. परंतु त्यांची संख्या मे ते ऑक्टोबरपर्यंत कमी होती. मात्र तुलसी विवाह झाल्यावर पुन्हा विवाहसंख्या वाढली. त्याचदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भावही ओसरला होता. मात्र आता पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक विवाहइच्छुकांनी आपले मुहूर्त पुढे ढकलले आहेत, अशी माहिती एका मंगल कार्यालय चालकाच्या कर्मचाऱ्याने दिली.

अनेक वस्तू मनासारख्या मिळाल्याच नाहीत

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन झाले. पण त्यातही केवळ एप्रिलचा महिना सोडला तर अनेकांनी उर्वरित महिन्यांत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसात विवाह सोहळे केले. त्यावेळी विवाहासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूही लॉकडाऊनमुळे काहींना खरेदी करता आल्या नव्हत्या. मात्र जे उपलब्ध आहे त्यात तडजोड करून अनेक जण जोडपी विवाहासाठी पोहोचली होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे