शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तीन हजार ६२१ एमएलडी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:39 AM

ठाणे : जिल्ह्यातील पाणीकपात थांबवल्याने मुंबईसहजिल्हाभरातील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला त्यांचा तीन हजार ६२१ एमएलडी हा रोजचा ...

ठाणे : जिल्ह्यातील पाणीकपात थांबवल्याने मुंबईसहजिल्हाभरातील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला त्यांचा तीन हजार ६२१ एमएलडी हा रोजचा मंजूर पाणी कोटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील भातसा या सर्वाधिक मोठ्या जलाशयासह बारवी धरण, आंध्रचे पाणी उल्हास नदीद्वारे, मोरबे, पिसे, हेटवणे आदी धरणातून बृहन्मुंबईसह ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या सहा महापालिका, अंबरनाथ, कुळगाव - बदलापूर या दोन नगर परिषदा आणि काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसी, एमजेपी, शहाड स्टेमघर प्राधिकरण आदी संस्थांना आता जिल्ह्यातील शहरांमधील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला रोज तीन हजार ६२२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करता येणार आहे.

--------------

मुंबई महापालिकेला भातसा मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातून पाणीपुरवठा होतो. याप्रमाणेच ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा भातसा, शहाड स्टेमघर, एमआयडीसी आणि पिसे धरणातून होतो. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून मिळत आहे. कल्याण -डोंबिवली मनपाला २६४ एमएलडी, भिवंडीला २१० एमएलडी, मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणीपुरवठा शहाड स्टेमघर व एमआयडीसीद्वारे उल्हास नदीतून होतो. बदलापूरला ३७ एमएलडी, अंबरनाथला ५५ आणि उल्हासनगरला १२० एमएलडी पाणी बारवी धरण व उल्हास नदीतून एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन (एमजेपी) प्राधिकरणाकडून रोज मिळत आहे. एमआयडीला १६० एमएलडी पाणीपुरवठाही बारवीतून होत आहे. शहरांच्या वाढीव लोकसंख्येस पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली. यामुळे या धरणात आता भरपूर पाणीसाठा आहे.