शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 06:44 IST

आठ वर्षांपूर्वी काशिमीरा भागात ही घटना घडली होती.

ठाणे : मित्र शिवशंकर ऊर्फ निकू चौरसिया (वय २३) याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करणाऱ्या कमलेश सहानी (२६),  मन्टू पटेल (३०)  आणि रूपेश साह (२५) या तिघांना जन्मठेपेची  शिक्षा ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश वसुधा भोसले यांनी शनिवारी  सुनावली. आठ वर्षांपूर्वी काशिमीरा भागात ही घटना घडली होती.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर एका हॉटेलच्या बाजूला २३ नोव्हेंबर २०१६ राेजी शिवशंकर ऊर्फ निकू चौरसिया याचा मृतदेह काशिमीरा पाेलिसांना मिळाला हाेता. शिवशंकरच्या वडिलांची मुंबईतील नंदी गल्लीत पानपट्टी होती. या हत्येत सहभाग असलेला आरोपी रूपेशचा भाऊ संतोष हा शिवशंकरचे वडील (शिवप्रसाद) पानपट्टीजवळील इमारतीत सुरक्षारक्षक होते. तो या पानपट्टीवर किरकोळ काम  करीत असे. 

संतोष काही काळासाठी  गावी जातांना त्याच्या जागी वॉचमनच्या कामासाठी रूपेशला ठेवत असे. त्यातूनच रूपेशची  शिवशंकर आणि त्याच्या वडिलांशी चांगली ओळख झाली होती.  रूपेश जेव्हा गावावरून कामासाठी यायचा. तेव्हा तो गावातील कमलेश सहानी आणि त्याचा मित्र मन्टू  याला भेटण्यासाठी जात असे. रूपेश आणि मन्टू एकत्र पेंटिंगची कामेही करीत होते. या तिघांचा गावकीमुळे परिचय होता.  शिवशंकरशी या तिघांची ओळख झाली होती. शिवशंकरला सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. तो सोन्याचे ब्रेसलेट, अंगठ्या आणि सोनसाखळी वापरायचा.   तिघांची नजर शिवशंकरच्या सोन्यावर होती. 

या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात ६ जुलै २०२४ रोजी झाली. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी पाेलिसांसह २१ साक्षीदार तपासले. सर्व साक्षी, पुरावे पडताळल्यानंतर न्यायालयाने कमलेश, मन्टू आणि रूपेश या तिघांनाही खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात दहा वर्षे कारावास तर पुरावा नष्ट केल्याने तीन वर्षे कारावास तसेच प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

असा रचला कट

रूपेश, कमलेश आणि मन्टू या तिघांनी संगनमताने  २२ नोव्हेंबर २०१६  रोजी  शिवशंकरला दारू पाजली.  नशेचे पदार्थही  त्याला दिले. नशेत असताना दगडाने ठेचून  तिघांनी त्याची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर काशिमीरा पोलिसांनी रूपेश आणि मंटू यांना ६ जानेवारी २०१७ रोजी तर कमलेशला ९ जानेवारी २०१७ रोजी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय