शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

मे अखेर सुरू होणार तीन उड्डाणपूल, अंतिम आराखडा दोन दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 3:57 AM

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले.

ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले.दरम्यान कोपरी पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता आणि पर्यायी वाहतुकीचा अंतिम आराखडा दोन दिवसात सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.मंगळवारी सकाळपासून आयुक्तांनी विविध विकास कामांची पाच तास पाहणी करून अधिकाºयांशी, नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी खोपट येथील थांबलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून केवळ पुनर्वसनामुळे रस्त्याचे काम थांबले असेल तर बाधित होणाºया नागरिकांचे बीएसयूपी किंवा रेंटल हाऊसिंगमध्ये पुनर्वसन करून काम ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचे रुंदीकरण करता येऊ शकेल काय याची चाचपणी करण्याच्या सूचना देऊन या रस्त्याचा प्लेन टेबल सर्वे करण्यासंबंधी त्यांनी संबंधित अधिकाºयांना सांगितले.या भेटीत आयुक्तांनी जोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन करून त्याचे पुनरूज्जीवन करण्याबाबत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून तुम्हाला बेघर करणार नाही असा शब्द दिला.दरम्यान शहरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करून अल्मेडा चौक येथील पूल १५ एप्रिल, मल्हार सिनेमा जवळील पूल १५ मे आणि कॅसल मिल येथीलपूल ३० मे अखेर सुरू होईल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे नागरिकांची सोय होईल.>पार्र्किं ग सुविधा मिळणारमनोरूग्णालय आणि मॉडेला मिल या ठिकाणी रस्ते आणि पार्किंग सुविधा कशा निर्माण करता येतील, याची चाचपणी करण्याविषयीही त्यांनी अधिकाºयांशी चर्चा केली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी