शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

साडेतीन लाख बेघर

By admin | Updated: March 19, 2017 05:41 IST

मागील अनधिकृत किंवा धोकादायक इमारतींमधून रहिवाशांना बाहेर काढले, तर त्यांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचा सरकारचा निर्णय असल्याने ठाण्यात किमान

ठाणे : मागील अनधिकृत किंवा धोकादायक इमारतींमधून रहिवाशांना बाहेर काढले, तर त्यांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचा सरकारचा निर्णय असल्याने ठाण्यात किमान साडेतीन लाख रहिवासी बेघर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी पालिकेने केलेल्या सर्व्हेत तीन हजार ६११ इमारती धोकादायक आणि ८९ अतिधोकादायक असल्याचे आढळले होते. त्यात यंदा भर पडणार आहे. त्यामुळे बेघर होणाऱ्या रहिवाशांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.पावसाळ््यापूर्वी धोकादायक इमारतींचा होणारा सर्व्हे पुढील महिन्यात परीक्षा संपताच सुरू होईल आणि नव्या निर्णयानुसार मिारतींची वर्गवारी करून त्या पाडण्याची कारवाई सुरू होईल. पालिका अनधिकृत, धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करणार नसल्याने या इमारतीत अथवा बांधकामात राहणाऱ्या सुमारे साडेतीन लाख रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. ठाणे महापालिकेने मागील वर्षी केलेल्या सर्व्हेत शहरात ३ हजार ६११ धोकादायक आणि ८९ अतिधोकादायक इमारती असून यातील अनेक इमारती तोडल्या आहेत. दरम्यान, अधिकृत धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींत ५८९३ कुटुंबे वास्तव्यास असून त्यात १८ हजार रहिवासी वास्तव्यास आहेत. अनधिकृत धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये ७२ हजार कुटुंबांचे वास्तव्य असून तेथील रहिवाशांची संख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. आता क्लस्टर योजना लागू झाल्याने या साडेतीन लाख रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. या योजनेला मंजुरी मिळाली असली तरी ती न्याय प्रक्रियेत अडकल्याने प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना क्लस्टरची आठवण होते. परंतु, प्रत्यक्षात हे क्लस्टर धोरण ठाण्यासाठी राबवले जाणार आहे का, असा सवाल मात्र नेहमीच सर्वसामान्य ठाणेकरांना सतावत आहे. कौसा येथील लकी कम्पाउंड इमारती दुर्घटना एप्रिल २०१३ मध्ये घडली. त्यानंतर, शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांच्या प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आहे. या इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्यांसाठी मग क्लस्टर म्हणजेच सामूहिक विकास योजनेचा प्रस्ताव पुन्हा एकदा पुढे आणला गेला. परंतु, या योजनेच्या नावाखाली पुन्हा शहरात अनधिकृत इमारतींचे इमले उभारले गेले आहेत. त्याला जबाबदार कोण, सद्य:स्थितीमध्ये ठाणे शहरात १४ लाख १४ हजार ८२२ चौरस मीटर क्षेत्रफळावर बेकायदा बांधकामे उभी आहेत. त्यातील अनेक भूखंड हे शासकीय मालकीचे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनाचे काय करणार, असाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)तीन हजार इमारती धोकादायक पुढील महिन्यात पुन्हा सर्व्हेठाणे पालिकेने मागील वर्षी नव्या धोरणानुसार केलेल्या सर्व्हेत ३ हजार ६११ इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली होती. या नव्या धोरणानुसार अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे, अशा सी-१ प्रकारामध्ये शहरातील एकूण ८९ इमारतींचा समावेश असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३ इमारती या केवळ नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असल्याची माहितीही या सर्व्हेतून समोर आली होती. त्यानंतर, यातील बहुतेक इमारती रिकाम्या केल्या असून अनेकांचे पुनर्वसनदेखील केले आहे. परंतु, आता नव्या धोरणानुसार पालिका शहरातील अशा प्रकारच्या इमारतींचे पुन्हा एकदा पावसाळ्यापूर्वी सर्व्हे करणार असून त्यात ज्या इमारती राहण्यास अयोग्य असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार, पालिकेने आता पुन्हा नव्याने सर्व्हे सुरू केला असून त्यात धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता रहिवाशांचा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही कारवाई करताना या इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन मात्र पालिका करणार नाही. त्यामुळे आता राजकीय मंडळी या निर्णयाविरोधात आवाज उठवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बांधकामांमध्ये तब्बल साडेतीन लाख रहिवासी वास्तव्यास असल्याने या रहिवाशांच्या मतांचा जोगवा राखण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी मंडळी अथवा विरोधक काय भूमिका घेतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.