शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खेमानी येथे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

उल्हासनगर : शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असताना, दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...

उल्हासनगर : शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असताना, दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिका पाणी पुरवठा विभाग मात्र याबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

उल्हासनगरात पाणी वितरण अनियमित होत असल्याने, अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली. गेल्या आठवड्यात चोपडा कोर्ट, आंबेडकरनगरमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ महिला रस्त्यावर उतरून त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांनी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करतो, असे आश्वासन देऊन महिलांना घरी पाठविले होते. मात्र दोन दिवसानंतरही पाणी पुरवठा नियमित झाला नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेवर धडक देऊन पाणी टंचाईबाबत जाब विचारला. शहर पूर्वेत अनेक भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, असे असताना दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रभाग अधिकारी, प्रभाग सभापती यांच्यासह पाणी पुरवठा विभागाला माहिती देऊनही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यास कर्मचारी येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

महापालिका पाणीपुरवठा विभाग ढिम्म असल्याने, शहरात ३० टक्केपेक्षा जास्त पाणी गळती होत असल्याचे बोलले जाते. शहरवासीयांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी काही वर्षांपूर्वी ३५० कोटींची पाणी वितरण योजना राबवून शहरभर नवीन जलवाहिन्या टाकून जलकुंभ व बुस्टर पंप मशीन बसविण्यात आले. मात्र योजना योग्य रितीने राबविली नसल्याने, पाणी वितरण योजना फसल्याची टीका होत आहे. खेमानी येथील जलवाहिनी फुटल्याबाबत विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांना संपर्क साधला असता झाला नाही.