शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्षाला हजार तक्रारी निकाली, नव्या तक्रारींमुळे दावे प्रलंबित, आज राष्ट्रीय ग्राहक दिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 03:53 IST

विविध कंपन्या, आस्थापनांकडून फसवणूक झालेल्या आणि त्याबाबत मंचाकडे दाद मागणाºया ग्राहकांचे प्रश्न जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोडवत असतो. २०१७ च्या वर्षअखेरीस ठाणे ग्राहक मंचात आजपर्यंतच्या सुमारे ३५०० तक्रारी प्रलंबित आहेत.

- स्नेहा पावसकरठाणे : विविध कंपन्या, आस्थापनांकडून फसवणूक झालेल्या आणि त्याबाबत मंचाकडे दाद मागणाºया ग्राहकांचे प्रश्न जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोडवत असतो. २०१७ च्या वर्षअखेरीस ठाणे ग्राहक मंचात आजपर्यंतच्या सुमारे ३५०० तक्रारी प्रलंबित आहेत. २०१७ मध्ये नव्याने सुमारे १००० तक्रारी मंचात दाखल झाल्या असून तितक्याच अर्थात ९०० ते १००० तक्रारी निकाली काढण्यात मंचाला यश आले आहे.सदनिकाखरेदी, इन्शुरन्स पॉलिसी, मोबाइल, फ्रीज, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉस्पिटल, कॉलेजेसशी व्यवहाराच्या प्रकरणात ग्राहकांना फसवले जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यापूर्वी काही ग्राहकांना पुरावे गोळा करणे, कागदपत्रांचा व्यवहार, न्यायालयात उपस्थित राहणे, या गोष्टी कटकटीच्या आणि वेळकाढू वाटल्याने ते ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार पुढे चालवत नसत. मात्र, आता ग्राहक सजग होत असून अशा कंपन्यांविरोधात अधिकाधिक तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत आणि दाखल होणाºया तक्रारी सोडवून ग्राहकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कायम प्रयत्नशील असतो. २०१६ च्या अखेरीस प्रलंबित तक्रारी २७०० इतक्या होत्या. नवीन ११०० तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर, सुमारे १३०० तक्रारी निकाली काढल्या होत्या. यंदा २०१७ च्या अखेरीस सुमारे ३५०० इतक्या तक्रारी प्रलंबित असून सुमारे ९५० तक्रारी निकाली काढलेल्या आहेत.एका महिन्याला अधिकाधिक तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र, त्या तुलनेत नवीन तक्रारींची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रलंबित तक्रारींची संख्या कमी होत नाही. उलट, वाढतच असल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालय