शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

ठाणे जिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लगबग! २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज

By सुरेश लोखंडे | Updated: June 10, 2024 16:59 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे.

ठाणे : वळवाच्या पावसाने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कहर केलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामास अनुसरून असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये बी-बियाण्याच्या, खताच्या खरेदीस अनुसरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातही या हंगामात सरासरी ६० हजार हेक्टर शेती लागवडीखाली येणार आहे. त्यासाठी तब्बल २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज लक्षात घेऊन तशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजार हेक्टरवर अधिक लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. गेल्यावर्षी ५३ हजार ७४२ हेक्टरवर भात पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदाच्या या खरीप हंगामास अनुसरून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसाेदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रुपाली सातपुते, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदी अधिकाऱ्यांनी एकत्र येत घेतलेल्या निर्णयानुसार कृषी विभागाने ११ हजार ११० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी शासनाकडे केली असता जिल्ह्यासाठी दहा हजार मेट्रिक टन खताचा साठा मंजूर केला आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीस अनुसरून मंजूर खताच्या साठ्यापैकी सात हजार ९०० मे. टन युरिया खताचा वाटा त्यात आहे. याशिवाय जिल्ह्यांसाठी २२ हजार क्विंटल भात बियाण्यांची गरज आहे. त्यात ४५ टक्के बियाणे बदल गृहित धरून नऊ हजार ९०० क्विंटल भात बियाण्यांची माग जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे. या बियाण्यांपैकी दाेन हजार २०० क्विंटल बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील असून सात हजार ७०० क्विंटल बियाणे खाजगी बियाणे उत्पादक कंपन्याकडून जिल्ह्याला पुरवण्यात येणार आहे. तर उर्वरित १२ हजार १०० क्विंटल भात बियाणे शेतकरी स्वत:कडील वापरणार असल्याच्या माहितीला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दुजाेरा दिला आहे.नियंत्रण कक्ष -खते, बियाणे व कीटकनाशके यांच्या पुरवठ्याबाबतच्या अडचणी, बोगस खते, बियाणे विक्री, जादा दराने निविष्ठांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांना ७०३९९४४६८९ या माेबाइल क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क करता येईल.भरारी पथके -कृषी सेवा केंद्रांकडून रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी, बेकायदा विक्री जादा दराने विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात सहा भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहेत. ही भरारी पथके केव्हाही अचानक कृषी केंद्रांना भेट देतील व तपासणी करतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी