शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

निवडणूक रोखे विरुद्ध न्याय यात्रा अशी लढाई; माजी मंत्री जयराम रमेश यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 05:35 IST

"या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे"

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय यात्रा नसून वैचारिक यात्रा आहे. आतापर्यंत या यात्रेने १६ राज्यांतील ११० जिल्ह्यांतून सहा हजार किमी अंतर पार केले. त्याचवेळी भाजपने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून सहा हजार कोटींचा पैसा गोळा केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील लढाई ही सहा हजार कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड विरुद्ध सहा हजार किमी न्याय यात्रा अशी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी केले.

जयराम रमेश म्हणाले की, या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे. युवा, महिला, किसान, श्रमिक व हिस्सेदारी न्याय हे पाच निवडणुकीचे मुद्दे राहणार आहेत. भाजपने आता आमची खाती बंद केली. आम्ही जनतेकडून पैसे जमवले आहेत, परंतु आमची खाती गोठवल्याने ते आम्हाला खर्च करता येत नसल्याचेही ते म्हणाले.

 काँग्रेसला पांगळे करण्याचा कट भाजपवाले आखत असल्याची टीका रमेश यांनी केली. ज्या कंपनीचा नफा २० कोटींचा आहे, ती कंपनी २०० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे कसे खरेदी करते.  रोखे खरेदीतील काही कंपन्या पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित आहेत, असा आरोपही त्यांनी केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्वेषाचे राजकारण करीत आहेत. मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही रमेश यांनी केला. 

आनंद आश्रमासमोर झळकले काँग्रेसचे झेंडे

राहुल गांधी ठाण्यात आल्याने त्यानिमित्ताने शहरात पोस्टर लावण्यात आले होते. तसेच प्रथमच टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे काँग्रेसचे झेंडे झळकले होते. शरद पवार गटाचे झेंडेही येथे लागले होते.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी