शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १४ मेपर्यंत आंदोलनासह जमावासाठी बंदी आदेश राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 00:16 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे आणि साठा करणे तसेच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला बंदी घालण्यात आल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.आपल्या मनाई आदेशामध्ये पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा आणि उपोषणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तशी काही आंदोलनेही सुरु आहेत. येत्या १० मे रोजी रोजी शब-ए-कदर त्यापाठोपाठ १३ मे रोजी परंपरेने येणारी शिवजयंती तसेच १४ मे रोजी रमजान ईद त्याचबरोबर अक्षय्य तृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असे सण आणिस उत्सव पार पडणार आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) आणि ( ३) अन्वये जिवित तसेच वित्त सुरक्षित राहण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा मनाई आदेश लागू केल्याचे यामध्ये म्हटले आहे.* असा आहे आदेश-तलवारी, भाले, दंड, बंदुका आणि लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. तसेच क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे, साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. ) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे आदींना मनाई राहणार आहे. कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे. किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन अस्थिर होईल, अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा प्रति घोषणा देणे आदी कृत्यांना मनाई केली आहे.यांना मनाई आदेश लागू नाही-सरकारी नोकर, लग्न कार्यासाठी जमलेले लोक, अंत्यसंस्कारासाठी काढलेली मिरवणूक, न्यायालयीन कामकाज, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त आणि त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका आदीेंना हा मनाई आदेश लागू राहणार नाही. हा आदेश आधी ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला होता. गुरुवारी यामध्ये सुधारणा करुन तो ३० एप्रिल ते १४ मे २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात वाढविण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी