शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १४ मेपर्यंत आंदोलनासह जमावासाठी बंदी आदेश राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 00:16 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे आणि साठा करणे तसेच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला बंदी घालण्यात आल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.आपल्या मनाई आदेशामध्ये पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा आणि उपोषणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तशी काही आंदोलनेही सुरु आहेत. येत्या १० मे रोजी रोजी शब-ए-कदर त्यापाठोपाठ १३ मे रोजी परंपरेने येणारी शिवजयंती तसेच १४ मे रोजी रमजान ईद त्याचबरोबर अक्षय्य तृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असे सण आणिस उत्सव पार पडणार आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) आणि ( ३) अन्वये जिवित तसेच वित्त सुरक्षित राहण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा मनाई आदेश लागू केल्याचे यामध्ये म्हटले आहे.* असा आहे आदेश-तलवारी, भाले, दंड, बंदुका आणि लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. तसेच क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे, साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. ) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे आदींना मनाई राहणार आहे. कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे. किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन अस्थिर होईल, अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा प्रति घोषणा देणे आदी कृत्यांना मनाई केली आहे.यांना मनाई आदेश लागू नाही-सरकारी नोकर, लग्न कार्यासाठी जमलेले लोक, अंत्यसंस्कारासाठी काढलेली मिरवणूक, न्यायालयीन कामकाज, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त आणि त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका आदीेंना हा मनाई आदेश लागू राहणार नाही. हा आदेश आधी ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला होता. गुरुवारी यामध्ये सुधारणा करुन तो ३० एप्रिल ते १४ मे २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात वाढविण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी