शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बदलापुरात आचारसंहितेचे तीन तेरा, राजकीय बॅनर्स जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:53 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत.

अंबरनाथ  - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत. काही ठिकाणी नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर, तर काही ठिकाणी कोकण म्हाडा महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे बॅनर्स काढण्यासाठी आचारसंहिता पथक पोहोचलेलेच नाही. त्यामुळे आचारसंहिता पथक नेमके करतेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आचारसंहिता लागू झाल्यावर बदलापूर शहरातील बॅनर काढण्यात आले आहेत; मात्र ग्रामीण भागात पालन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहिता लागून आठवडा उलटलेला असतानाही ग्रामीण भागात पुढाऱ्यांचे बॅनर्स झळकत आहेत. ग्रामीण भागातील होर्डींगवर आचारसंहिता पथकाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. बदलापूर खरवई गाव सोडल्यावर चामटोलीपासून ग्रामीण भागाला सुरुवात होते. चामटोली ते वांगणी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे बॅनर झळकत आहेत. बदलापूर-कर्जत रस्त्यावर खाजगी जागेत मोठमोठे होर्डींग उभे करण्यात आले आहेत. त्यावरही कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच या भागात कोणताही पुढारी, वाटेल त्या ठिकाणी बॅनरबाजी करीत आहे. निवडणूक काळातही हीच परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुखांचा वाढदिवस होऊन १० दिवस उलटले असतानाही त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर अजुनही दिसत आहेत. गोरेगांव-वांगणी या भागात गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीदेखील बॅनर लावण्यात आले आहेत.आचारसंहिता काळात बॅनर लावताना त्याची परवानगी घेणे आणि परवानगीचा क्रमांक बॅनरवर टाकणे बंधनकारक आहे; मात्र एकाही बॅनरची परवानगी घेतलेली दिसत नाही.आचारसंहितेच्या काळात राजकीय पुढाऱ्यांचा हा अतिउत्साहीपणा रोखण्याचे काम आचारसंहिता पथकाच्या प्रमुखाने करणे गरजेचे आहे; मात्र आचारसंहिता प्रमुख ग्रामीण भागात जातच नसल्याचे दिसत आहे.कार्यालयात बसून कामकाज सुरु असल्याने शहराबाहेर नेमके काय सुरु आहे, याची कल्पना कोणालाच नाही. आचारसंहिता काळात पक्षाचे झेंडे काढणे गरजेचे आहे; मात्र तेदेखील तसेच ठेवण्यात आले आहेत.महामार्गावर ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची कल्पना न केलेलीच बरी. ग्रामीण भागात मिळेल तिथे बॅनर लावले जात असून, आचारसंहितेला कुणीच जुमानत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे